Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'

Abhishek Banerjee: बंगालमध्ये खासदार अभिषेक बॅनर्जींवर प्राणघातक हल्ला; दगड, चपला, अंडी फेकली, शर्ट फाडला; हेल्मेट घातल्यानं डोकं वाचलं, म्हणाले, 'अजून एक महिना सुद्धा झालेला नाही तोपर्यंत..'

ABP माझा 1 week ago

Abhishek Banerjee: पश्चिम बंगालमधील सोनारपूर दक्षिणमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. ते निवडणुकीतील हिंसाचाराचे बळी ठरलेल्या टीएमसी कार्यकर्त्यांना भेटायला आले होते.

तिथे पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि घोषणाबाजी करत त्यांच्यावर हल्ला केला. लोकांनी त्यांच्यावर दगड, चपला आणि अंडी फेकली, तसेच त्यांचा शर्ट फाडला. हेल्मेट घालून अभिषेक यांना त्या भागातून बाहेर काढण्यात आले. हल्ल्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक म्हणाले, "बघा त्यांनी माझ्यासोबत काय केले. हे पूर्वनियोजित होते. या भागात पोलीस नाहीत. त्यांना मला मारायचे होते. हेल्मेटमुळे माझे डोके वाचले. आम्ही अशा हल्ल्यांना घाबरणार नाही."

उच्च न्यायालयात दाद मागणार

अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मी या घटनेबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे आणि राज्यपालांनाही कळवणार आहे. जोपर्यंत स्थानिक पोलीस आपले दल पाठवून पीडितांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देत नाहीत, तोपर्यंत मी हे ठिकाण सोडणार नाही." अभिषेक बॅनर्जी यांनी या हल्ल्यासाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारला जबाबदार धरले. ते म्हणाले, "हा हल्ला भाजपने घडवून आणला आहे. त्यांनी काय केले आहे ते पाहा. हा त्यांच्या लोकशाहीचा पुरावा आहे. महिनाही उलटलेला नाही आणि पोलीस कुठेच दिसत नाहीत."

सोनारपूरमध्ये राजकीय हिंसाचार

दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात असलेले सोनारपूर हे एक अत्यंत संवेदनशील क्षेत्र मानले जाते. येथे टीएमसी आणि भाजप यांच्यात तीव्र लढत होत असते. निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर येथे राजकीय हिंसाचार घडत असतो. निवडणुकीनंतर, मे 2026 मध्ये, सोनारपूरच्या कामराबाद नस्करपाडा परिसरात भाजप कार्यकर्ते सौमेन दास यांच्या घराला आग लावण्यात आली होती. स्थानिक टीएमसी कार्यकर्त्यांनी आधी धमकी देऊन नंतर घर जाळल्याचा आरोप त्यांनी केला होता. भाजपच्या रूपा गांगुली या सोनारपूर दक्षिणच्या आमदार आहेत. त्यांनी 2026 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या उमेदवार अरुंधती मैत्रा (लवली मैत्रा) यांचा पराभव केला होता.

बनावट सही प्रकरणात आज सीआयडीचे समन्स

दरम्यान, बनावट सही प्रकरणी आज बंगाल सीआयडीने अभिषेक बॅनर्जी यांना समन्स बजावले. त्यांना 1 जून रोजी सीआयडी मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, सीआयडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी गेले आणि त्यांनी नोटीस बजावली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha