"मी, टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे का?" व्यावसायिक असलेल्या एका मित्राने विचारलेला प्रश्न.
"तुझी आर्थिक साक्षरता काय कौल देते?" माझा प्रतिप्रश्न.
मग त्याने त्याच्या एकंदरीत त्याच्याकडे असलेल्या स्थावर मालमत्तेची आकडेमोड सांगायला सुरुवात केली.
"यातली निकड भासल्यास ताबडतोब रोकड सुलभता देईल अशी किती मालमत्ता आहे?" माझ्यातल्या सल्लागाराने विचारले.
"लगेच तर नाही सांगता येणार पण होऊ शकते", असे मोघम उत्तर मित्राने दिले.
तुझ्या पहिल्या प्रश्नाला काहीतरी उपप्रश्न आहे असे मला जाणवतेय म्हटल्यावर मित्राने उत्तर दिले, " मला टर्म इन्शुरन्स हा 'खर्च' वाटतो."
तेव्हा कुठे मला कळाले की खरी मेख ही आहे तर!
विमा घेताना पुढील घटकांचा विचार केला गेला पाहिजे -
वरील सर्व मुद्दे एका आर्थिक सूत्रात बसवून तुम्हाला किती रकमेचा विमा गरजेचा आहे, हे तपासून विमा खरेदी करणे गरजेचे आहे.
कुठल्या वयोगटाला वार्षिक उत्पन्नाच्या किती विमाछ्त्र मिळू शकते, याची एक आदर्श सूची पुढील प्रमाणे असते.
मित्राकडून बाहेर पडतांना नवी चारचाकी गाडी बघितली. सहजच विचारले या गाडीचा विमा उतरविला आहे का? अर्थातच.. त्याने उत्तर दिले.
का? कारण गाडीला काही अपघात वगैरे झाल्यास खिशातून खर्च करणे परवडण्यासारखे नसते म्हणून. मग तुम्हाला काही झाल्यास कुटुंबाचा व व्यवसाय सुरु ठेवण्यासाठीचा खर्च कोण करणार? माझा प्रश्न. मित्र अनुत्तरीत झाला.म्हणूनच सुरक्षितता ही "प्राथमिकता" असली पाहिजे "पर्याय" नाही, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
- अतुल प्रकाश कोतकर
9423187598
atulkotkar@yahoo.com

