Representational Image
बस्ती: उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील मुण्डेरवा साखर कारखान्यामध्ये आतापर्यंत १५ लाख ५० हजार टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे.
कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक ब्रजेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी सुरू आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये अशी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत १५ लाख ५० हजार टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. उसाच्या खरेदीबाबत उतपादक शेतकऱ्यांना मोबाइलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जात आहे.