Dailyhunt

तमीळनाडू: वासुदेवनल्लूर कारखाना बंद असल्याने ऊस इतरत्र वळविण्याची मागणी

ChiniMandi Marathi 5 years ago

Representational image

मदुराई : बुरेवी चक्रीवादळामुळे विरुधुनगर जिल्ह्यातील ५४८.०४३ हेक्टर जमीन खराब झाली आहे. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या ९५३ शेतकऱ्यांना १.०८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आर. कन्नन यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या ऑनलाइन तक्रार निवारण बैठकीत शेतकऱ्यांनी वासुदेवनल्लूर कारखाना बंद असल्याने ऊस इतरत्र वळविण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी कन्नन म्हणाले, कृषी विभागाने १२९.७५५ हेक्टर क्षेत्रात झालेल्या पीक नुकसानीबाबत २४६ शेतकऱ्यांना २४.७५ लाख रुपये दिले आहेत. हॉर्टिकल्चर विभागाने ४८.२८८ हेक्टरहून अधिक पिकांच्या नुकसानीबाबत ७०७ शेतकऱ्यांना ८३.६५ लाख रुपयांची भरपाई दिली आहे.

कृषी विभागाचे सहसंचालक एस. उदंतरामन यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन निधीतून शेतकऱ्यांना ही मदत करण्यात आली आहे. ज्या पिकांचा विमा असेल, त्यांची भरपाई नंतर दिली जाईल.

दरम्यान, इशान्य मॉन्सूनमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू आहे. गावांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या नुकसान भरपाई मागणीच्या निवेदनांचा स्वीकार करू नये असे आदेश दिलेले नाहीत. सर्व अर्ज स्वीकारले जातील. दरम्यान, तमीलवा विवासायगल संगमचे नेते एन. ए. रामचंद्रराजा यांनी सांगितले की नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी स्वतंत्र शिबिर आयोजित करण्याची मागणी आहे. जिल्ह्यात अलिकडे झालेल्या तीन दिवसीय शिबिराची माहिती अनेक शेतकऱ्यांना नव्हती. वासुदेवनल्लूरमधील धरनी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे इथला ऊस राज्यातील अन्य साखर कारखान्यांमध्ये पाठवण्याची गरज आहे.
दरम्यान, धरनी साखर कारखाना मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi