मुंबई: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत आणि धान्य, उद्यापासून मदतीचं वाटप करणार अ्सल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले,'आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबांची तातडीने चूल पेटावी यासाठी १० किलो तांदूळ, १० किलो गहू , ५ किलो डाळ, ५ लिटर रॉकेल ही मदत सुद्धा देण्यात येत आहे.'
डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

