आसाममधील नागाव जिल्ह्यातील कटीमारी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) छावणीत सोमवारी झालेल्या गोळीबाराने संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला धक्का बसला आहे. छावणीत एका सहायक उपनिरीक्षकाने (एएसआय) आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला.
तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे छावणीत खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. (CRPF)
मिळालेल्या माहितीनुसार, कटीमारी येथील सीआरपीएफ छावणीत तैनात असलेले एएसआय बलानी प्रेमब्रह्म (Balani PremBrahm) यांनी अचानक आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने (Service revolver) सहकारी जवानांवर गोळीबार केला. या अनपेक्षित हल्ल्यात जवान रामनवल सिंग यादव आणि विष्णू प्रसाद बघेल गंभीर जखमी झाले. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला.
एएसआयनेही स्वतःवर ही झाडली गोळी
घटनेनंतर लगेचच छावणीत घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, सहकारी सैनिकांवर गोळीबार (Soldier shooting) केल्यानंतर एएसआय बलानी प्रेमब्रह्म (Balani PremBrahm) यांनी स्वतःवर गोळी झाडली. गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेत तीन सैनिकांचा मृत्यू झाला. तर गोविंद श्रीपुल नावाचा आणखी एक सैनिकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने नागाव येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच, सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. संपूर्ण छावणीला घेराव घालण्यात आला आणि घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली. अधिकाऱ्यांनीजवानांचे मृतदेह ताब्यात घेतले असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
एएसआयने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार का केला हे अद्याप स्पष्ट नाही. तसेच तपास यंत्रणा वैयक्तिक संघर्ष, मानसिक तणाव, कर्तव्याशी संबंधित संघर्ष किंवा इतर संभाव्य कारणांसह सर्व संभाव्य हेतूंचा कसून तपास करत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, तपास पूर्ण झाल्यावरच या घटनेचे खरे कारण समोर येईल. या दुःखद घटनेमुळे सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच, या घटनेमुळे सुरक्षा दलांमधील तणाव व्यवस्थापन आणि त्यांच्या जवानांचे मानसिक आरोग्य यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरही मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

