Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा

वी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.)२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 2 मे रोजी म्हणजेच शनिवारी २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करणार आहे.

संघ निवडीनंतर, कर्णधार हरमनप्रीत कौर, मुख्य निवडकर्ता अस्मिता शर्मा आणि बीसीसीआय सचिव देवजित सैकिया एका पत्रकार परिषदेत संघांची घोषणा करतील. निवड समिती २८ मे ते २ जून दरम्यान इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी, १० ते १३ जुलै दरम्यान लॉर्ड्सवर होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी आणि इंग्लंड 'अ' संघाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत 'अ' संघाची निवड करेल.

भारताला २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकाच्या गट १ मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाचा सामना सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्स या संघांशी होणार आहे

भारताच्या तयारीबद्दल बोलायचे झाल्यास, संघाने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका १-४ ने गमावली आहे, ही चिंतेची बाब आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात झालेल्या २०२० च्या महिला टी-२० विश्वचषकात उपविजेता ठरला होता. पण या प्रकारात त्यांना अद्याप विजेतेपद मिळवता आलेले नाही. २०२५ मध्ये मायदेशात महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि यावेळी विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी असेल. दरम्यान, यजमान इंग्लंडने २८ एप्रिल रोजी आपला संघ जाहीर केला, तर गतविजेत्या न्यूझीलंडनेही आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यावर्षी प्रथमच या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार असून, सात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ३३ सामने खेळले जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi