Dailyhunt

जलयुक्त शिवार प्रकरणात ठाकरे सरकार तोंडघशी - प्रा भानुदास बेरड

मा.

देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील मागील सरकार ने महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार राबवली, या योजनेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले होते, या योजनेच्या प्रभावी आंमलबजावणाने महाराष्ट्रातील भूजल पातळी वाढली आहे, या योजने मुळे शेतकर्यांच्यां आर्थिक परिस्थिति मध्ये व ऊत्पन्ना मध्ये वाढ झाली आहे हे सरकार ने नेमलेल्या समिति ने मान्य केले आहे,

जलयुक्त शिवार ही जनतेची आणि जनतेने राबविलेली योजना आहे. उच्च न्यायालयाद्वारे स्थापित देशभरातील तज्ञांच्या समितीने सुद्धा हीच बाब सांगितली होती. त्यामुळे संपूर्ण योजनेला बदनाम करणे, हे चुकीचेच होते.

आता योजनेच्या फायद्यांबाबत सरकारनेच उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारने ही योजना बदनाम करण्याचा प्रयत्न केला व हे ठाकरे सरकार तोंडघशी पडले आहे अशी प्रतिक्रिया भाजपा चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा भानुदास बेरड यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama