तुरुंगात असताना विविध निबंध किंवा लेखन उपक्रमांच्या माध्यमातून जेव्हा कैदी आपले मन मोकळे करतात, तेव्हा त्यांनी आयुष्यात काय गमावले आहे याची स्पष्ट जाणीव त्यांना होते. त्यांनी गमावलेल्या या अनुभवांतून आणि आत्मचिंतनातून संपूर्ण समाज खूप काही शिकू शकतो. गुन्हेगारीमुक्त समाज घडवण्यासाठी केवळ गुन्हेगारांना शिक्षा देणे किंवा त्यांना तुरुंगात डांबणे पुरेसे नसते, तर त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना समाजात पुन्हा मानाने जगण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे असते.
सुटके नंतर जेव्हा हे बंदी नागरिक म्हणून बाहेर पडतात, तेव्हा त्यांना स्वीकारणे, त्यांच्या रोजगाराची व पुनर्वसनाची सोय करणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची एक नैतिक जबाबदारी बनते. जर समाजाने त्यांना पुन्हा गुन्हेगारीच्या गर्तेत ढकलण्याऐवजी स्वीकारले आणि त्यांच्या पुनर्वसनात मदत केली, तरच खऱ्या अर्थाने एक सुरक्षित आणि गुन्हेगारीमुक्त समाज निर्माण होऊ शकतो. स्वातंत्र्याचा हा खरा संदेश कैद्यांच्या पश्चात्तापातून आणि समाजाच्या सहानभूतीतूनच साकार होऊ शकतो.

