Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पावसाळ्यापूर्वी ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फडणवीस सरकारकडून ३६,५८५ कोटींच्या कर्जमाफीला मंजुरी

पावसाळ्यापूर्वी ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फडणवीस सरकारकडून ३६,५८५ कोटींच्या कर्जमाफीला मंजुरी

मुंबई

हाराष्ट्र सरकारने पावसाळ्याच्या तोंडावर राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे फडणवीस सरकारने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील एका मोठ्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे सुमारे ६५ लाखांहून अधिक कर्ज खात्यांना लाभ मिळणार असून, एकूण ३६,५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. या ऐतिहासिक निर्णयाचा थेट फायदा राज्यातील साधारण ५६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

कर्जमाफीसोबतच प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार याबाबत सविस्तर माहिती जाहीर करेल.

दुसऱ्या बाजूला, पायाभूत सुविधांचा विकास गतीने करण्यासाठी मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक' (AIIB) कडून ५० कोटी डॉलर्सचे कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी AIIB आणि NDB या दोन्ही संस्थांकडून एकूण ८,७०० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळणार असून, यामुळे राज्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: KhabarNama