Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ठाकरेंच्या 6 खासदारांसाठी भाजपची दारं बंद का? 'ऑपरेशन टायगर' वर CM फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा

ठाकरेंच्या 6 खासदारांसाठी भाजपची दारं बंद का? 'ऑपरेशन टायगर' वर CM फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा

Letsupp 1 week ago

Devendra Fadnavis On Operation Tiger : ऑपरेशन टायगरअंतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदरांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

अनेकांना धक्का देणाऱ्या या ऑपरेशन टायगरवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन टायगरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सहापैकी दोन खासदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती पण आम्ही त्यांनी स्पष्ट सांगितलं की, आमच्याकडे सध्या व्यवस्था नाही असं या मुलाखतीमध्ये बोलातना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, स्पष्टच सांगायचं झालं तर आम्ही आमचं दार बंद ठेवलं होतं. आम्ही या कोणाही करता भाजपचं दार उघडलं नाही कारण आमचं असं मतं होतं की, त्यांना जर जायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत जावं कारण शिवसेना हा त्यांचाच पक्ष आहे. ते शिवसेनेतूनच निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेतच जावं. त्यामुळे भाजपमधून आम्ही प्रयत्नही केला नसल्याची माहिती या मुलाखतीमध्ये बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, हे खरं आहे की, खासदार – आमदार शिवसेनेतून (Shivsena) शिवसेनेत जातील, एनसीपीतून (NCP) एनसीपीत जातील हा अलिखित नियम समजा. असं नाही की, खूप मोठी राजकीय गरज आहे. शेवटी राजकारणातले नियम जे असतात, ते गरजेप्रमाणे ठरतात. असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

ऑपरेशन टायगरला मदत केली – देवेंद्र फडणवीस

तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये बोलताना ऑपरेशन टायगरसाठी (Operation Tiger) आम्ही शिवसेना शिंदे गटाला मित्रपक्ष म्हणून मदत केली असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? सचिन अहिरनंतर बडा नेता सोडणार पक्षाची साथ

यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा तर अशा प्रकारचे जे काही ऑपरेशन्स होतात त्यात काय घडलं, कोणी केलं, कसं केलं या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. मी एवढंच म्हणेन की, मित्रपक्षानं ऑपरेशन केलं आणि मित्रपक्षाला आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यांना जी आवश्यक पडता पडली तेवढी मदत ही मित्रपक्ष म्हणून आम्ही केली असल्याचा दावा या मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Letsupp