जळगाव राहूल शिरसाळे । जिल्हा परिषदेच्या समोर अनुकंपा धारक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी आज २१ जानेवारीपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार सरळ सेवा भरतीत २० टक्के जागा अनुकंपा साठी आरक्षित असतांना भरती होत नसल्याने अनुकंप धारकांनी न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेत गेल्या ९ ते १० वर्षांपासून अनुकंपाच्या भरत्या झालेल्या नसल्यामुळे आज अनुकंपधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेत विविध संवर्गाची अनेक पदे रिक्त असतांना अनुकंपा नियुक्ती दिली जात नाही.
यावेळी किरण साळुंखे, सचिन हिवरकर, सुप्रिया सपकाळे, साजीद तडवी, अजय सोनवणे, योगेंद्र विसपूते, असलम तडवी, मुबारक तडवी, मुकेश चौधरी, मयुर पाटील, राजेश तडवी, प्रदीप महाजन, उमेश मराठे, चंद्रकांत हतागडे, प्रशांत जाधव, विशाल जाधव, अजय महाजन, रोहित श्रीखंडे, नितीन खैरनार, विशाल देवराज यासह आदी अनुकंपाधारक उपस्थित होते.
Prev Post
शिवसैनिकांची सीमेवर कर्नाटक पोलिसांसोबत झटापट
Next Post

