नवी दिल्ली : देशात कोरोना साथरोगाची दुसरी लाट आली असताना देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळून येताहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य ...
नवी दिल्ली : देशात कोरोना साथरोगाची दुसरी लाट आली असताना देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळून येताहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन गोयल यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्य सरकार कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका डॉ. हर्षवर्धन यांनी केली.
याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, करोनावरील लसीच्या तुटवड्याचे महाराष्ट्र सरकारचे आरोप धादांत खोटे आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून आपण गेल्या वर्षभरापासून बघतोय, महाराष्ट्र सरकार ढिसाळपणे काम करत असून करोना व्हायरसविरोधी लढाईत प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राची चालढकल सुरू आहे.
