नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात दोन चिमुकल्यांचा घटसर्प (Diphtheria) आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावात वास्तव्यास असलेल्या एका राजस्थानी कुटुंबातील ही दोन बालके असल्याची माहिती समोर येत आहे.
एकीकडे सरकारकडून घटसर्प हा आजार जवळपास संपल्याचा दावा केला जात आहे, तसेच दुसरीकडे लसीकरणावरही मोठा खर्च होत असताना दोन निष्पाप बालकांचा यामुळे मृत्यू होतो, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर मात्र आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

