Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नेपाळ महापुरात २७५ भारतीय अजूनही बेपत्ता; मृतांचा आकडा १,३४४ वर

नेपाळ महापुरात २७५ भारतीय अजूनही बेपत्ता; मृतांचा आकडा १,३४४ वर

MahaeNews 4 days ago

वी दिल्ली | नेपाळ-तिबेट सीमेवर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण ढगफुटी आणि महाप्रलयात आतापर्यंत मृतांचा आकडा १,३४४ वर पोहोचला आहे. या आपत्तीत अडकलेल्या १६६ भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी तब्बल २७५ भारतीय अजूनही बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिली आहे.

'द इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

चीनच्या तिबेट स्वायत्त क्षेत्रात (TAR) अडकलेले १,९०७ भारतीय नागरिक सुरक्षितपणे नेपाळच्या हद्दीत परतले असून, तिथे आता एकही भारतीय अडकलेला नसल्याची पुष्टी चिनी अधिकाऱ्यांनी केली आहे. नेपाळमध्ये स्थानिक प्रशासन आणि लष्कराने १२,००० हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. मात्र, ढिगाऱ्यांतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याने मृतांची संख्या वाढली असून सुमारे ५,००० नागरिक अद्याप बेपत्ता आहेत.

चाकण परिसरातील अतिक्रमण कार्यवाहीला सुरुवात; पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी करणार पाहणी

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, भारत सरकार नेपाळ प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. संकटाच्या या काळात भारताने शेजारील देशाला तातडीची मोठी मदत पाठवली आहे:

९५ टन मदत साहित्य: पूरग्रस्तांसाठी आवश्यक अन्नधान्य, औषधे आणि वैद्यकीय साहित्याची रसद पाठवण्यात आली आहे.

५४ तज्ज्ञांचे पथक: नेपाळच्या विनंतीनुसार ३० बोगदा बचाव तज्ज्ञ (Tunnel Rescue Experts), १९ फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक प्रत्यक्ष घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.

पायाभूत साहित्याचा पुरवठा: तात्पुरते बेली ब्रिज, फॉरेन्सिक किट्स आणि इतर अत्यावश्यक साधनसामग्री लवकरच रवाना केली जाणार आहे.

भारतीय तज्ज्ञ आणि वैद्यकीय पथके नेपाळी यंत्रणांसोबत खांद्याला खांदा लावून शोध व बचावकार्यात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews