मुंबई - मराठी अभिनेता अंकुर वाढवेला 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो आणि त्याच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देतो.
काल अभिनेत्यावर हल्ला करण्यात आला. त्यासंबंधी अंकुरनं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं. त्याचबरोबर नेमकं काय घडलं? याबद्दल अंकुर वाढवेनं 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
अंकुर वाढवेची पोस्ट
अभिनेत्यानं सांगितलं काय घडलेलं?
'दुसऱ्या दिवशी मला जाणवलं की, गावामध्ये गुन्हेगारी वाढलीये. मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेलो. पोलिसांनी त्या तरुणाला बोलावलं. तो तरुण माझी माफी मागायला लागला. मी त्याला एवढंच सांगितलं की, ज्या घरावर तू लघुशंका करत होता, त्या घरातील वहिनींची माफी माग. या संपूर्ण घटनेतून मला एकच सांगायचंय की, पुसदमध्ये वाढत्या गुन्हेगारीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.'
दरम्यान, अंकुर वाढवेच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं 'गावठी' या सिनेमामध्ये आणि 'गेमाडपंती' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

