म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे विभागाने आषाढीसाठी पुणे-मिरज गाडी २३ ते २९ जुलै दरम्यान दररोज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पुण्यातून सकाळी ८.४० वाजता सुटेल. ती सायंकाळी पावणेसात वाजता मिरज येथे पोहोचेल.
मिरज येथून पुण्यासाठी रात्री साडेनऊ वाजता रेल्वे सुटणार आहे. या गाडीला हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, वासुद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालागाव, लंगरपेठ, कठवे महांकाळ, सालगरे असे थांबे राहणार आहेत.
पंढरपूर आणि मिरजसाठी ५४ विशेष गाड्या
अनारक्षित विशेष गाड्यांमध्ये भुसावळ-पंढरपूर (४), कोल्हापूर-कुर्डूवाडी (१६) आणि पुणे-मिरज (१४) अशा एकूण ३४ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. आरक्षित विशेष गाड्यांचे आरक्षण एक जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर; तसेच 'आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. अनारक्षित गाड्यांचे तिकीट 'यूटीएस' प्रणालीद्वारे, ॲपद्वारे मिळेल.
दिंड्यांना मिळणार २० हजारांचे अनुदान
दिंड्यांना अनुदान देण्याचे यंदाचे तिसरे वर्ष असून, त्याचा लाभ सुमारे एक हजार ४०० दिंड्यांना होणार आहे. त्यासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शेकडोच्या संख्येने पालख्या पंढरपूरच्या दिशेने जातात. या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात. दुखापतग्रस्त होतात. एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत काहींचा मृत्यूही होतो; तसेच अनेकांना अनेक कारणांनी वारी करणे शक्य होत नाही.
विशेष सहाय्य विभागाकडून अनुदान जाहीर

