सुनील जाधव, बीड: रक्ताच्या नात्यात असलेल्या विश्वासाला तडा देणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना गेवराई तालुक्यातील एका गावातून समोर आली आहे. आपल्याच सख्ख्या आत्याच्या घरी जाऊन, तिच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नात्यांमधील मर्यादा ओलांडणाऱ्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुलगी ही अवघ्या १५ वर्षे १० महिने वयाची असून ती अल्पवयीन आहे. आरोपी हा तिचा सख्खा मामाचा मुलगा आहे. सर्वत्र शांतता होती, तेव्हा आरोपी दुचाकीवरून आपल्या आत्याच्या घरी पोहोचला. घरात प्रवेश करताच त्याने आत्याला (मेहुणी) कोठे आहे? विचारणा केली. आत्याला त्याच्या मनात असलेला कुटील डाव ठाऊक नव्हता. मात्र, आरोपीने काहीही विचार न करता थेट घरात प्रवेश केला आणि पीडित मुलीचा हात धरून तिला बळजबरीने घराबाहेर ओढू लागला.
आईला धक्काबुक्की
पोलीस तपास आणि गुन्हा दाखल
या तक्रारीवरून चकलांबा पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा (IPC कलम ३६३ व अन्य कलमान्वये) गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

