मुंबई: मराठी टीव्ही आणि सिनेइंडस्ट्रीतला देखणा चेहरा, उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता गिरीश परदेशी गेल्या १५ वर्षापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. 'या सुखांनो या', 'वहिनीसाहेब' यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि 'फॉरेनची पाटलीण' सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेल्या गिरीश परदेशी यानं 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइच्या सेलिब्रिटी कॉर्नर' या खास मुलाखतीत त्याचा प्रवास उलगडला आहे.
करिअर, मालिका,सिनेमांच्या सेटवरचे किस्से... त्यानं दिलखुलासपणे शेअर केले आहेत. तसंच गेल्या १० वर्षापासून तो कुठं होता, त्यानं सिनेइडंस्ट्रीतून ब्रेक का घेतला, याचा खुलासाही केलाय.
पॅशन म्हणून झाली करिअरची सुरुवात
NSD बद्दल समजल्यानंतर आपणही प्रयत्न करून का बघू नये, असा विचार केला. आपण १०० टक्के देऊय, प्रयत्न करण्यात कुठे कमी पडायला नको...असं म्हणून मी परीक्षा दिली अन् सिलेक्टही झालो, असं गिरीशनं सांगितलं. NSD मध्ये निवड झाल्यानंतर आता दुसऱ्या करिअर क्षेत्रात काम करण्याचा प्रश्नच नव्हता, असंही तो म्हणाला.
'या सुखांनो या' मालिकेत झाली एन्ट्री
'या सुखांनो या' मालिकेतील कलाकारांसोबत काम करत असताना आम्ही एक कुटुंबच झालो होतो, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं होतं, असंही गिरीशनं म्हटलं. तर विक्रम गोखले यांच्यासोबत काम करताना सुरुतीला थोडं दडपणही होतं, असंही त्यानं सांगितलं.

