मुंबई : गोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर शुभमन गिल आणि जोस बटलरच्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघावर चार विकेटनी मात केली.
'गुजरात' ने 'बेंगळुरू'ला १९.२ षटकांत १५५ धावांत रोखले. यानंतर विजयी लक्ष्य १५.५ षटकांत सहा विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही लढत झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना गिलने आक्रमक सुरुवात केली. त्याला साई सुदर्शनची फारशी साथ लाभली नाही. गिल पॉवरप्लेमध्येच बाद झाला. यानंतर बटलरने फटकेबाजी करून 'गुजरात'ला शंभर धावांच्या समीप पोहोचविले. भुवनेश्वरकुमार आणि शेफर्डने 'गुजरात' च्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल तेवतियाने रशीद खानच्या साथीने 'गुजरात'चा विजय साकारला. सामना संपल्यावर कॅप्टन शुभमन गिल याने आपली प्रतिक्रिया दिली.
आरसीबीसारख्या संघाला या खेळपट्टीवर १६० वर रोखणं हे गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. आम्ही जिंकण्याचं कारण म्हणजे फील्डिंग, कारण याआधी आम्ही इतकी चांगली फील्डिंग केली नाही. खास करून विराट भाई आक्रमण करत होता त्यानंतर आम्ही सगळे एकत्र आलो, हे आमच्यासाठी चांगलं ठरलं. मी आज पहिला बॉल खेळताना असं वाटलं की लकी आहे आणि दुसऱ्या बॉलवर मी माझ्या झोनमध्ये आलो, मी विचार केला की आज माझा दिवस आहे. स्वत:वर आत्मविश्वास वाढला होता त्यामुळे मी विचार केला की गोलंदाजांवर आक्रमण करावं. आम्ही जास्तच विकेट गमावल्या, असं शुभमन गिल म्हणाला.
तत्पूर्वी, गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. रबाडाने टाकलेल्या पहिल्या षटकात कोहलीने सलग पाच चौकार लगावले. या वेळी कोहलीच्या चाहत्यांनी मैदानावर डोक्यावर घेतले. या षटकात कोहलीने २१ धावा चोपल्या. पुढील घटकात कोहलीने मोहम्मद सिराजलाही षटकार ठोकला. मात्र, याच षटकात सिराजने जेकब बेथेलला बाद केले. त्याच्या पुढच्या षटकात रबाडाने कोहलीला बाद करून 'बदला' पूर्ण केला.
कोहली १३ चेंडूंत पाच चौकार व एक षटकारसह २८ धावा करून बाद झाला. यानंतर देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटीदारने डावाची सूत्रे हाती घेतली. या जोडीने पॉवरप्ले अखेर 'बेंगळुरू'ला २ बाद ५९ धावांपर्यंत पोहोचविले. सातव्या षटकात या जोडीने पुन्हा १२ धावा वसूल केल्या. या घटकापर्यंत सारे काही सुरळीत होते. मात्र, आठव्या षटकात अर्षद खानला षटकार मारून पाटीदार बाद झाला आणि 'बेंगळुरू'ची गाडी रूळावरून घसरली. 'बेंगळुरू'चे अखेरचे सात फलंदाज ७५ धावांत बाद झाले.

