Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
INDvsENG : विजयाची पाटी कोरीच! कॅप्टन श्रेयस अय्यरने 3 जणांना पराभवासाठी ठरवलं व्हिलन, कोणाची नावं घेतली?

INDvsENG : विजयाची पाटी कोरीच! कॅप्टन श्रेयस अय्यरने 3 जणांना पराभवासाठी ठरवलं व्हिलन, कोणाची नावं घेतली?

मुंबई : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये शनिवारी भारतावर इंग्लंडने ४ विकेटने विजय मिळवला आहे. मँचेस्टमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पहिल्यांदा बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये १९०-७ धावा केल्या होत्या.

भारताकडून अभिषेक शर्माने ४३ धावा आणि ईशान किशनने ४९ धावा केल्या होत्या. मात्र पाठलाग करताना इंग्लंड संघाचा डाव गडगडला होता, परंतु एकट्या जेकब बेथल याने नाबाद ७६ धावा करत सामना इंग्लंडला जिंकवून दिला. खरं पाहायला गेलं तर हा सामना भारताच्या हातामध्ये होता, मात्र एक १७ ओव्हर भारतासाठी गेमचेंजर ठरली. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रतिक्रिया देताना कोणाला कोणाला व्हिलन ठरवलं जाणून घ्या.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी कोणावरही बोट दाखवणार नाही. पहिल्या नो बॉल नंतर वाटलं होतं की तो कमबॅक करेल. पण १७ वी ओव्हर पूर्णपणे गेमचेंजर ठरली आणि तिथेच आम्ही बॅकफूटवर गेलो. पिचवर उसळी सारखी बदलत होती, तरीही आम्ही चांगला स्कोअर केला होता. खरं सांगायचं तर पहिल्या 15 ओव्हर आपण पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं. मग अचानक जेकब आला आणि त्याने मॅच पलटवली. त्याला खेळपट्टी चांगली माहित होती. सॅम करननेही ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलिंग केली त्याचं प्लॅनिंग एकदम पक्कं होतं. वैभव बेधडक असून नेटमध्ये तो ज्या इंटेन्सिटीने फलंदाजी करतो त्यातून खूप शिकण्यासारखं आहे. मला वाटलं नव्हतं की तो दबावामध्ये येईल, असं श्रेयस अय्यर म्हणाला.

श्रेयस अय्यरने या पराभवासाठी जेकब बेथल, सॅम करन आणि आपल्या रवी बिश्नोईला पराभवासाठी जबाबदार ठरवलं आहे. श्रेयस अय्यरने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून तो एकदाही विजयी झालेला नाही. जेकब याने नाबाद ७६ धावा, करनने तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. भारताने आयर्लंडविरूद्धचे दोन सामने गमावले होते, त्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंड संघाने हा विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

वैभव सूर्यवंशीचे पदार्पण

बेबी बॉस म्हणून ओळखला जाणारा भारताचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी याने आज पदार्पण केले. वैभव भारताकडून सर्वात कमी वयात करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. वैभवने दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला आहे. भारताकडून त्याने १५ वर्षे ९९ दिवसांचा असताना हा विक्रम नावावर केलाय. आज पठ्ठ्याने १४ धावा काढल्या यातही त्याने २ षटकार लगावले. भारतीय संघाला मालिका बरोबरीत करायची असेल तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims