म. टा. प्रतिनिधी, नागपूर: आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा शरीर साथ देईनासे होते किंवा एखादा गंभीर आजार माणसाला अंथरुणाला खिळवून ठेवतो, तेव्हा खरा संघर्ष सुरू होतो तो कुटुंबाचा. व्हेंटिलेटरवर खिळलेले शरीर आणि कृत्रिम श्वासोच्छवासावर चालणारे आयुष्य पाहायचे की वेदनादायी उपचार थांबवून आपल्या प्रिय व्यक्तीला सन्मानाने निरोप द्यायचा?
अशा वेळी होणारी द्विधा मनस्थिती आणि भावनिक कोंडी आता सुटणार आहे. 'माझ्या निरोपाची वेळ मीच ठरवणार' हा हक्क देणाऱ्या लिव्हिंग विल अर्थात इच्छा मृत्यूपत्र आता सरकारी स्तरावर अधिकृतपणे जतन केले जाणार आहे.
'लिव्हिंग विल' म्हणजे काय?
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यातील महानगरपालिका आयुक्त आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांकडे आता संरक्षक म्हणून ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागरिकांची ही अंतिम इच्छा सुरक्षित ठेवण्यासाठी mahaulb.in हे विशेष डिजिटल पोर्टल सज्ज झाले आहे. घरबसल्या आपली माहिती भरून, कायदेशीररित्या तयार केलेली विल नागरिक अपलोड करू शकतात. त्यानंतर संरक्षकाची ऑनलाइन वेळ घेऊन प्रत्यक्ष भेट घ्यावी लागेल. जे नागरिक तंत्रज्ञानाशी परिचित नाहीत, ते थेट कार्यालयात जाऊन नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर करू शकतात. अर्ज केल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधित अधिकारी कागदपत्रांची खात्री करतील आणि तुमची विल कायमस्वरूपी जतन केली जाईल.
बदल वा रद्द करण्याचीदेखील सोय

