Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mamata Banerjee: भाच्यावर, नेत्यांवर हल्ले, आमदारांचीही साथ मिळेना; ममता दीदींना संताप अनावर! म्हणाल्या, '... तोपर्यंत मी मरणार नाही'

Mamata Banerjee: भाच्यावर, नेत्यांवर हल्ले, आमदारांचीही साथ मिळेना; ममता दीदींना संताप अनावर! म्हणाल्या, '... तोपर्यंत मी मरणार नाही'

श्चिम बंगाल: सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण बदलले आहे. टीएसीची सत्ता गेली आहे. भाजप उदयास आली आहे. त्यानंतर विविध घटना घडत आहेत. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का देत विधानसभा काबिज केली.

शुभेंदू हे ममतांचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याचकडून ममतांना आसमान पाहावे लागले आहे. दरम्यान, सत्तेतून पायउतार झालेल्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाच्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यानंतर टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाला. त्यामुळे ममता बॅनर्जी या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी कोलकातामध्ये धरणे आंदोलन सुरु केले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. जोपर्यंत मी तुम्हाला सत्तेतून हटवणार नाही, तोपर्यंत मी मरणार नाही, असं ममतांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे ममतांनी याप्रकारचं विधान केलं आहे. एकतर लढू नाहीतर आम्ही मरु अशा प्रकारचा इशारा देत ममतांनी थेट भाजपला आव्हान दिले आहे.

भाजपला मी वेळोवेळी मदत केली

त्या पुढे म्हणाल्या की, भाजपचे अध्यक्ष अनेकदा मला कामांसाठी फोन करायचे, पण मी कधी त्याबद्दल माध्यमांमध्ये बोलले नाही. भाजप वगळता इतर सर्व पक्षांसोबत माझे चांगले संबंध आहेत. पण तरीही भाजपने जेव्हा माझ्याकडे मदत मागितली, तेव्हा तेव्हा मी त्यांना पूर्णपणे सहकार्य केले आहे. त्यांच्या वाईट आणि संघर्षाच्या दिवसांमध्ये मी त्यांना साथ दिली. मी तर स्वतः त्यांना (शुभेंदू) फोनही केला होता. मी इथेच आहे. आणि मला इथेच रहायचे आहे.जोपर्यंत मी जीवंत आहे, तोपर्यंत एका लढवय्या सैनिकाप्रमाणे लढणार आहे.

दांड्या मारणाऱ्या आमदारांना इशारा

ममता यांचं कोलकातामधील वाईमध्ये धरणे आंदोलन सुरु आहे. त्यांनी पक्षाच्या बैठकांना दांडी मारणाऱ्या आमदारांना लक्ष्य केल. त्यांनी इशारा दिला की, जे आपल्याशी गद्दारी करत आहेत, त्यांना सांगायचंय की, "ईश्वर-अल्लाह तेरो नाम, सबको संमती दे भगवान"

दुसऱ्या पक्षातील नेत्यांकडे भाजपची सत्ता

दरम्यान, भाच्यावरील हल्ल्याबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केलं. ममता म्हणाल्या की, त्यादिवशी अभिषेकच्या डोक्याला त्यादिवशी दगड लागले असते तर त्याचा जीव गेला असता. आता भाजपमधील जुन्या नेत्यांकडे सत्ता नाही. दुसऱ्या पक्षातून भाजपत गेलेल्या नेत्यांकडे सत्ता आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims