पुणे: लॉन्ग वीकेंड आला मुंबईतील रहिवासी बाहेरगावी जायला निघतात. आज सकाळपासूनच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पण आजपासून या पुणे-मुंबई प्रवासाचं स्वरूपचं बदलणार आहे.
1 मे, महाराष्ट्र दिनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील प्रवासासाठी 'मिसिंग लिंक'चा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, शनिवारी, 2 मे रोजी या मार्गावर वाहतूक सुरू होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यमुंत्री (सावाजननक उपक्रम) श्रीमती मेघना साकोरे बोडीकरसुद्धा उपस्थित असतील.
देशातील पहिला द्रुतगती महामार्ग
1 मे रोजी दुपारी मिसिंग लिंकचं लोकार्पण होणार आहे. परंतु, कार्यक्रमानंतर मंडप आणि इतर सर्व अडथळे काढल्याशिवाय वाहतूक सुरू करणं सुरक्षित नाही. त्यामुळे वाहनचालकांसाठी 1 मे रोजी रात्री उशीरा किंवा मध्यरात्रीनंतरच वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तेव्हाही या मार्गावर केवळ हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. अवजड वाहनांना 31 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे सहा महिन्यांपर्यंत मार्गावर प्रवेशबंदी असेल.

पावसाळ्यात कोंडीची समस्या
कसा आहे प्रकल्प?

'मिसिंग लिंक'वरील दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून 180 मीटर खोल आहे. या बोगद्याचं बांधकाम ब्लास्टिंग या आधुनिक तांत्रिक पद्धतीने करण्यात आले आहे. पण 'मिसिंग लिंक'वर तांत्रिकदृशट्या सर्वात आव्हाणात्मक काम म्हणजे या दोन बोगद्यांमधील 650 मीटर लांब केबल-स्टेब पूल. टायगर व्हॅलीच्या मधोमध उभारला असलेला हा पूल 182 मीटर उंचीचे दोन स्तंभ ईणि 240 केबलवरती उभा आहे. 'ववुंड टनेल टेस्ट', 'फॅ हटग व टे्साइल टेस्ट' तसेच 'स्टे केबल टेस्ट' या आधुनिक चाचण्या करूनच या पुलाची सुरक्षितता तपासण्यात आली.
मिसिंग लिंक म्हणजे काय?

