Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nashik News : वारी चुकायाची नाही! 'सर्जा-भास्कर' ओढणार संत निवृत्तीनाथांचा रथ, नाशिकमधील 'या' बैलजोडीला मिळाला मान; मालकाचे डोळे पाण्याने डबडबले

Nashik News : वारी चुकायाची नाही! 'सर्जा-भास्कर' ओढणार संत निवृत्तीनाथांचा रथ, नाशिकमधील 'या' बैलजोडीला मिळाला मान; मालकाचे डोळे पाण्याने डबडबले

. टा. वृत्तसेवा, नाशिक : आषाढी एकादशीसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी सोहळ्यात श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ ओढण्याचा बहुमान इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील 'सर्जा-भास्कर'या बैलजोडीला मिळाला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे मुरंबी येथील वारकरी व शेतकरी गजीराम पुंजा यांच्यामते यांच्या या बैलजोडीला गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांदा रथ ओढण्याचा बहुमान मिळाला.

बैलजोड्या आलटून-पालटून रथ ओढतात

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, रथ व नगारा गाडी ओढण्यासाठी सक्षम बैलजोडीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर तसेच पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा ५० दिवसांचा पालखी सोहळा असतो. या बैलजोड्या आलटून-पालटून रथ ओढतात. दरम्यान, पावसाळ्यात दररोज १० ते १५ किमी प्रवास करावा लागत असल्याने सक्षम आणि प्रशिक्षित बैलजोडीची निवड केली जाते.

'चित्या' आणि 'धिंगाण्या'लाही मान

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथ ओढण्याचा मान प्रथमच सिन्नर तालुक्याला मिळाला आहे. सुरेगाव येथील शेतकरी संपत भालेराव यांच्या 'चित्या' आणि 'धिंगाण्या' या बैलजोडीची निवड करण्यात आली असून, या निवडीमुळे भालेराव कुटुंबाचा अनेक वर्षांचा प्रयत्न अखेर यशस्वी ठरला आहे. निवड झाल्यानंतर संपत भालेराव आणि त्यांचे बंधू राजाराम भालेराव यांनी पौष्टिक खुराक देत बैलांची विशेष काळजी घेतली जात आहे.

माउलींच्या पालखीचे वेळापत्रक जाहीर

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी येत्या आठ जुलैला पंढरपूरला प्रस्थान ठेवणार असून, नऊ आणि दहा जुलैला पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील मुक्कामाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आळंदी संस्थानने जाहीर केले असून, यंदा पालखीचे आठ जुलैला प्रस्थान आणि २४ जुलैला पालखी पंढरपूरला पोहचणार असल्याचे स्पष्ट केले. आळंदी ते पंढरपूर प्रवासात १७ मुक्काम, चार गोल रिंगण आणि तीन उभी रिंगणे होणार आहेत.

पालखीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात आठ जुलै आळंदी येथून प्रस्थान, नऊ व १० जुलै पुण्यात मुक्काम, ११ व १२ जुलै सासवड मुक्कामी, १३ जुलै रोजी जेजुरी, १४ जुलै रोजी वाल्हे मुक्कामी राहणार आहे. १५ जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी १६ जुलैला लोणंद येथे मुक्कामी असेल. लोणंद येथून पुढे दुपारी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी असणार आहे. १७ जुलैला फलटण, १८ जुलै रोजी बरड येथे पालखी मुक्कामी असेल.


नातेपुते येथे पालखी १९ जुलैला मुक्कामी राहणार आहे. २० जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. २१ जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी मुक्कामी असेल. ठाकुरबुवा समाधीजवळ २२ जुलैला तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भेंडीशेगावला मुक्कामी राहणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims