ठरलं तर मग या मालिकेच्या 3 July 2026 च्या एपिसोडमध्ये प्रतिमा आणि रविराज गाडीत बसल्यावर सायली अर्जुनला खुश होऊन सांगते की मला अगदी लख्ख आठवलं आहे. किती वर्षा आपण ज्या तन्वीला शोधतोय ती मीच आहे.
अर्जुनही तिच्यासाठी खूप खुश असतो.
तर सचिन आणि राकेश एका गाडीमध्ये दारू पीत बसलेले असतात. राकेशने गाडीचा ब्रेक फेल केल्यामुळे नक्कीच रविराज, प्रतिमा आणि सायली यांचा अपघात होणार आणि त्यात ते जाणार असा खयाली पुलाव ते बनवत असतात. त्यामुळे त्यांची आधीच पार्टी सुरू झालेली असते. आपल्या वाटेतील अडसर दूर झाल्यामुळे दोघेही खुश असतात. पण अजून ही आनंदाची बातमी आपल्याला आली कशी नाही असा प्रश्न सचिनला पडतो. यावर राकेश म्हणतो की हा अपघात जिथे होणार आहे ती अगदी सुनसान जागा आहे त्यामुळे तिथे फारसा कोणी जात नाही. अगदी एखादा माणूस तिथे गेला तर त्याला पोलिसांपर्यंत जायला वेळ लागेल त्यामुळे वेळ लागतो असेल.
तितक्यात सुमनचा फोन येतो. त्याला वाटतं की ती दुःखाची बातमी द्यायला फोन करत असेल. राकेश फोन उचलून स्पीकरवर ठेवतो. तू म्हण त्याला सांगत असते की रविराज भाऊजी प्रतिमा वहिनी आणि सायली कुठेतरी बाहेर गेलेत. त्यांचे फोनही लागत नाहीत आणि त्यांचा किती वेळ संपर्कही नाही त्यामुळे तू काहीही करून त्यांना शोध. राकेश तिला खोटा धीर द्यायचा प्रयत्न करतो. पण तितक्यात सायली आणि अर्जुन तिथे येतात आणि त्यांचा आवाज राकेश व सचिन ऐकतात त्यामुळे त्यांचा चेहराच उतरतो.
सायली जेव्हा घरात पाऊल ठेवते तेव्हा तिच्या लक्षात येते की आता ती नुसती सायली नाही तर या घरची नात तन्वी सुद्धा आहे. तिला सगळं अजून आठवत असतं. घरातले प्रत्येक जण त्यांची चौकशी करत असतात तेव्हा तिला त्या सगळ्यांची तिच्याशी असलेली खरी नाती ही आठवतात. समोर पूर्णा आजी बसलेली असते. सायली तिला जाऊन बिलगते. त्यानंतर अर्जुन त्यांच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार सांगतो ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो.
दुसरीकडे मधुभाऊ शुद्धीवर आल्यामुळे कुसुमने डॉक्टरांना बोलावलेलं असतं. मधु भाऊ मध्ये झालेली सुधारणा पाहून डॉक्टर ही खुश असतात. तिथं औषध देतात तेव्हा मधु भाऊ सतत सायली ची आठवण काढत असतात. डॉक्टरही सांगतात त्यांना लवकरात लवकर साईलीला भेटवा. ते माणसांमध्ये येऊन आता बरे झाले आहे तर त्यांना त्यांच्या हव्या असलेल्या माणसांना भेटू दे.
Tharala Tar Mag दुसरीकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा सायली खूप खुश असते कारण तिला तिची ओळख समजलेली असते. कधी एकदा जाऊन आपण सगळ्यांना खरं सांगतोय असं तिला झालेलं असतं पण अर्जुन मात्र शून्य आत गेलेला असतो. सायरी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो चिडतो. या अपघातात सायलीचा किंवा त्यांच्या बाळाचा काही बरं वाईट झालं असतं तर तू स्वतःला माफ करून घेऊ शकला नसता असं सायलीला सांगतो. आणि म्हणते की मी आणि बाळ दोघेही ठीक आहोत आणि आज मला माझी खरी ओळख मिळाली आहे. माझ्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. मग ती अर्जुनची मस्करी करू लागते तेव्हा कुठे तू नॉर्मल होतो. तितक्यात त्यांना कुसुमताई फोन करून बोलावून घेते. इतक्या रात्री तिचा फोन आल्यामुळे मधु भाऊंना काय झालं की काय असं त्यांना वाटतं आणि ते लगेचच आश्रमात जायला निघतात.
आश्रमात पोहोचल्यावर मधु भाऊंना ठीक झालेलं पाहून सायली अर्जुन खूप खुश होतात. मधुभाऊंना फारसं बोलायला जमत नसतं पण तरीही ते बोलायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की ही सायली नाही. ही तन्वी आहे. वकील साहेब आणि प्रतिमा यांची मुलगी. स्वतः मधु भाऊंच्या तोंडून हे ऐकून सायली अर्जुन पुन्हा खुश होतात. तितक्यात त्याच्या फोनवर डीएनए टेस्टचे रिपोर्ट सुद्धा आलेले असतात. त्यात पण सायलीचा डीएनए प्रतिमाच्या डीएनएशी मॅच झालेला असतो. शिवाय प्रियाने जे सॅम्पल लपवून सबमिट केलेलं ते सुद्धा मॅच झालेलं असतं. त्यामुळे सायली खूप खुश झालेली असते पण कुसुमताईला मात्र काहीच खरं कळत नाही.
दुसरीकडे राकेश तुरुंगात नागराज ला भेटायला जातो आणि त्यांचा प्लॅन फ्लॉप झाल्याची बातमी देतो. जे ऐकून नागराज भयंकर चिडतो आणि म्हणतो की मला वाटलेलं दोन वर्षे यु एस मध्ये राहून तू हुशार झाला असेल पण तू अजूनही बावळट आहेस. तुझा काहीच फायदा नाही. राकेश आपल्या वडिलांना समजवायचा प्रयत्न करतो पण नागराज मात्र भयंकर चिडलेला असतो.

