Dailyhunt
बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बुद्ध पौर्णिमेच्या मंगल दिनानिमित्त मी राज्यातील तसेच देशभरातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.

भगवान बुद्धांची बंधुभाव, प्रेम, करुणा आणि अहिंसेची शिकवण आज विशेष प्रासंगिक आहे. ही शिकवण सर्वांना शांतता, अहिंसा आणि बंधुतेच्या मार्गाने मार्गक्रमणा करण्याची प्रेरणा देवो, हीच या प्रसंगी प्रार्थना आहे, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr shasan