Dailyhunt
पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; 'या', योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; 'या', योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।

श्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. भाजपने तृणमूल काँग्रेसला सत्तेबाहेर काढत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या मुख्यालयात पोहोचून कार्यकर्त्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला.

यावेळी त्यांनी भविष्यातील धोरणांबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या.

पहिल्याचमंत्रिमंडळबैठकीत 'आयुष्मानभारत'लामंजुरी

पक्षाच्या मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 'आयुष्मान भारत' योजनेला हिरवा कंदील दिला जाईल. या योजनेमुळे राज्यातील लाखो नागरिकांना आरोग्यसेवेचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विकास, विश्वास आणि नव्या आशेचा नवा प्रवास
मोदी म्हणाले, "बंगालच्या भविष्याचा एक नवा प्रवास आजपासून सुरू होत आहे. विकास, अढळ विश्वास आणि नवी आशा यांचा संगम या प्रवासात दिसेल." त्यांनी प्रत्येक बंगाली नागरिकाला आश्वासन दिले की, भाजप सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिवस काम करेल.

महिला सुरक्षा आणि रोजगारावर भर

राज्यातील महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, महिलांना सुरक्षित वातावरण मिळेल. तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून स्थलांतरावर आळा घालण्याचेही सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

घुसखोरांविरोधातकठोरभूमिका

पंतप्रधानांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, राज्यात घुसखोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार ठोस पावले उचलेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

'नारीशक्ती'चाउल्लेख, विरोधकांवरनिशाणा

नारी शक्ती वंदन दुरुस्तीचा उल्लेख करताना मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "विकसित भारताच्या उभारणीत महिला शक्ती हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. मात्र, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी या शक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण केले."

महिलाआरक्षणालाविरोधकरणाऱ्यांनाजनताधडाशिकवेल

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. "आज भगिनी आणि कन्यांनी काँग्रेस, टीएमसी आणि डीएमकेला योग्य उत्तर दिले आहे. आगामी काळात इतर राज्यांमध्येही जनता अशा पक्षांना धडा शिकवेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढीलनिवडणुकांकडेलक्ष

भविष्यातील निवडणुकांवर भाष्य करत मोदी म्हणाले की, केरळमधील महिलाही पुढील निवडणुकीत काँग्रेसला योग्य उत्तर देतील. देशभरात महिला शक्ती निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times