Dailyhunt

Abhishek Bachchan : "आमच्यात फक्त 'पार्टनरशिप' आहे!" ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचे चोख प्रत्युत्तर

गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडचे पॉवर कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगत होत्या. ऐश्वर्याने 'जलसा' बंगला सोडल्यापासून ते दोघांच्या संभाव्य घटस्फोटापर्यंत अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

मात्र, आता स्वतः अभिषेक बच्चनने या सर्व अफवांना पूर्णविराम देत आपल्या खाजगी आयुष्याबद्दल अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले आहे. लिली सिंगला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत अभिषेकने त्यांच्या नात्यातील गुपिते उघड करत, त्यांच्यात पती-पत्नीपेक्षा एक भक्कम ‘पार्टनरशिप’ असल्याचे स्पष्ट केले आहे.

अभिषेकने या मुलाखतीत ऐश्वर्याच्या यशाबद्दल आणि त्यांच्यातील समतोलपणाबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले. तो म्हणाला, “ज्यावेळी माझ्या आई-वडिलांचे लग्न झाले, तेव्हा माझी आई वडिलांपेक्षा मोठी स्टार होती. त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट नवीन नाही. मी आणि ऐश्वर्या लग्नाआधीपासून एकमेकांना ओळखत होतो आणि चांगले मित्र होतो. लग्नानंतर तिने तिचे करिअर किंवा काम थांबवावे, अशी माझी कधीच इच्छा नव्हती. मला अशा नात्यात राहायचे नव्हते जिथे मला केवळ ‘पुरुष’ असल्याचा अहंकार मिरवता येईल.” अभिषेकच्या या विधानाने त्याने अप्रत्यक्षपणे घटस्फोटाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मात्र, अभिषेकने ज्या पद्धतीने त्यांच्या नात्यातील मैत्री आणि आदराचा उल्लेख केला, त्यावरून त्यांच्यात आजही घट्ट नाते असल्याचे दिसून येते. “आम्ही सुरुवातीपासूनच एकमेकांचे खंबीर साथीदार आहोत,” असे सांगत त्याने बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अभिषेकच्या या स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला असून, या मुलाखतीची सध्या चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook