रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते. त्यांचा जन्म कोलकाता येथे ७ मे १८६१ रोजी झाला. ते ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. अतिशय लोकप्रिय असलेला गीतांजली हा कवितासंग्रह त्यांनी लिहिला. त्यातील कविता टागोरांच्या संवेदनशील मनाची प्रचिती आणून देतात. 1913 साली नोबेल पारितोषिकाने सन्मानीत केले जाणारे ते जगातील पहिले गैरयुरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. टागोरांच्या काव्यात्मक गीतांकडे आध्यात्मिक आणि पारंपरिक म्हणून पाहिले गेले. बंगाली साहित्यावर रवींद्रनाथांचा एवढा प्रभाव आहे की, बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते. त्यांना कधीकधी बंगालचा बार्ड म्हणून संबोधले जाते. तसेच ते अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते.
कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बर्याचशा कविता लिहिल्या. 1877 पर्यंत त्यांनी त्यांच्या खर्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला. शांतिनिकेतनची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवींद्रसंगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला. रवींद्रनाथांनी रचलेली जन गण मन आणि आमार शोनार बांग्ला या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे जगातील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झाले. रवींद्रनाथ टागोर यांचे ७ ऑगस्ट 1941 रोजी निधन झाले.
जीवनपट
प्रारंभिक आयुष्य (1861 - 1901)
कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर (1817-1905) व आई शारदा देवी (1830 - 1875) यांच्या 14 अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे 13वे होत.़:11 11व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत 14 फेब्रुवारी 1873 रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.1213
1877 साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने 17व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले.14 याच काळात त्यांनी संध्या-संगीत(1882), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा भिकारिणी व सुप्रसिद्ध कविता निर्झरेर स्वप्नभंग आदी रचना लिहिल्या.1516
पत्नी मृणालिनीदेवी व रवींद्रनाथ 1883
बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु 1880 मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. 9-नोव्हेंबर-1883 रोजी त्यांनी मृणालिनी-देवी(जन्मनाव भावतारिणी 1873-1900) यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यू) झाली.17 1890 साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी व मुले 1898 साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते.18 हा काळ रवींद्रनाथांचा साधना काळ म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा 84 कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले.15 आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.1519
शांतिनिकेतन (1901 - 1932)
महात्मा गांधी व रवीन्द्रनाथ (सालः 1940)
1901 साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता . या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली.20 रवीन्द्रनाथांच्या पत्नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान 19-जाने-1905ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांन नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी,ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली.21 या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (1901) व खेया (1906) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा षीशश र्ींशीीश या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. 14-नोव्हे.-1913 रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते.22 1915 साली त्यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली. 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.
1921 साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरूल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे श्री-निकेतन असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.23 ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकार्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले.2425 1930 सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.26
अखेरची वर्षे (1932-1941)
रवींद्रनाथ (पहिल्या ओळीत डावीकडून तिसरे) इराणी संसद सदस्यांसोबत 1932 .
जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. 15-जानेवारी-1934 रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला.27 बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्र्यबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील 100 ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो.2829 पुनश्च (1932), शेष सप्तक (1935), पत्रपुत (1936) आदी गद्यपद्यांचा(िीेीश-िीेीश) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे 15 खंड संपादित केले. याशिवाय 'चित्रांगदा', श्यामा (1939), चंडालिका (1938) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले.30 याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (1933), मलंच (1934), रपव चार अध्याय (1934)आदी कादंबर्या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(पर्रीीींरश्रळीा) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे से (तो) (1937),तीन संगी (1940), गल्पस्वल्प (1941).31
इ.स. 1924 चिनी विद्वानांसमवेत त्सिंग्व्हा विद्यापीठात टागोर (मध्यात).
रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. 1937 साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा 1940 सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते.3233 7-ऑगस्ट-1941 रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.

