Dailyhunt
'प्रहार'चे बच्चू कडू आता शिंदे गटात; धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत पुनरागमन

'प्रहार'चे बच्चू कडू आता शिंदे गटात; धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत पुनरागमन

Nagpur Today 1 week ago

मुंबई : राज्याच्या राजकीय घडामोडींना वेग देणाऱ्या एका महत्त्वाच्या निर्णयात, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात अधिकृतरित्या प्रवेश केला.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांच्या उपस्थितीत कडू यांनी धनुष्यबाण स्वीकारत आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश जाहीर केला.

विशेष म्हणजे, बच्चू कडू यांची राजकीय कारकीर्द सुरुवातीला शिवसेनेतूनच आकाराला आली होती. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र मार्ग स्वीकारत 'प्रहार'च्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता पुन्हा शिवसेनेत परतल्याने त्यांच्या 'घरवापसी'ची चर्चा रंगू लागली आहे.

प्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना कडू यांनी सांगितले की, "हा निर्णय कोणत्याही पदासाठी नसून जनतेच्या प्रश्नांसाठी घेतला आहे. शेतकरी, कामगार आणि दुर्बल घटकांच्या हक्कासाठी लढा अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडला आहे." झेंडा बदलला असला तरी भूमिका आणि विचार कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रहार पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण
दरम्यान, बच्चू कडू यांनी आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून 'प्रहार'चा प्रवास थांबणार असला, तरी सामाजिक संघटना म्हणून 'प्रहार' पुढेही कार्यरत राहणार आहे.
या राजकीय घडामोडीमुळे विशेषतः विदर्भात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता असून, आगामी राजकारणात त्याचे परिणाम दिसून येण्याची चिन्हे आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi