Dailyhunt
Buddha Purnima: कधी आहे बौद्ध पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा-विधी आणि दानाचे महत्त्व

Buddha Purnima: कधी आहे बौद्ध पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा-विधी आणि दानाचे महत्त्व

  • बौद्ध पौर्णिमा कधी आहे
  • बौद्ध पौर्णिमेचे काय आहे महत्त्व
  • बौद्ध पौर्णिमा शुभ मुहूर्त, पूजा विधी
हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते ज्याला बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात.
पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी-नारायण यांची पूजा-आराधना केल्यास कुटुंबात सुख-समाधान, शांती, संपत्ती नांदते असे म्हटले जाते. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमादेखील म्हटले जाते. यंदा शुक्रवार, १ मे रोजी ही पौर्णिमा साजरी केली जाईल. जाणून घेऊया या पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी काय

कधी आहे बुद्ध पौर्णिमा

हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथीला बुद्ध पूर्णिमा दरवर्षी साजरी केली जाते. यंदा वैशाख पौर्णिमा तिथी ३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल आणि शुक्रवार १ मे रोजी रात्री १० वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होईल. अशातच उदय तिथीनुसार बुद्ध पौर्णिमा शुक्रवार १ मे रोजी साजरी केली जाईल. यावेळी ब्रम्ह मुहूर्त: सकाळी ४ वाजून १५ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटे असेल. अभिजित मुहूर्त: सकाळी ११ वाजून ५२ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे, विजय मुहूर्त: दुपारी २ वाजून ३१ मिनिटे ते दुपारी ३ वाजून २४ मिनिटे असेल.

Astro Tips: या शुभ नक्षत्रांमध्ये जन्मलेल्या मुली वडिलांसाठी मानल्या जातात शुभ, घरात आणतात सुख समृद्धी

या’ गोष्टी दान करा

अशा परिस्थितीत, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, तुम्ही गरीब आणि गरजू लोकांना पाण्याने भरलेले भांडे वाटू शकता. यासोबतच या दिवशी पखा, चप्पल, छत्री, धान्य किंवा फळे इत्यादी दान करणेदेखील खूप शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात.

बुद्ध पौर्णिमा उत्सव

या शुभ दिवशी, बुद्धांचे भक्त काही विशेष विधी करतात ज्यांची सुरुवात सकाळी लवकर स्नान करून आणि शुद्धतेचे प्रतीक असलेले पांढरे कपडे परिधान करून होते. बुद्धांच्या मूर्तीला स्नान घातले जाते आणि धूप, दिवे, फुले आणि फळे अर्पण केली जातात. शांतीपूर्ण प्रार्थना केल्या जातात, तर काही दिवसभर बुद्धांच्या शिकवणींचे पठण करतात.

Surya Nakshatra Parivartan: 28 एप्रिलला सूर्य करणार शत्रू नक्षत्रात संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हटले जाते?

वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला गौतम बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती असे मानले जाते. वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. बिहार मधील गया येथे बोधी वृक्षाखाली बसले असताना त्यांना याच दिवशी म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली होती. गौतम बुद्धांनी आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्गाची सर्वांना शिकवण दिली. बौद्ध धर्माची त्यांनी स्थापना केली. म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra