- बौद्ध पौर्णिमा कधी आहे
- बौद्ध पौर्णिमेचे काय आहे महत्त्व
- बौद्ध पौर्णिमा शुभ मुहूर्त, पूजा विधी
कधी आहे बुद्ध पौर्णिमा
हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथीला बुद्ध पूर्णिमा दरवर्षी साजरी केली जाते. यंदा वैशाख पौर्णिमा तिथी ३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी सुरु होईल आणि शुक्रवार १ मे रोजी रात्री १० वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होईल. अशातच उदय तिथीनुसार बुद्ध पौर्णिमा शुक्रवार १ मे रोजी साजरी केली जाईल. यावेळी ब्रम्ह मुहूर्त: सकाळी ४ वाजून १५ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटे असेल. अभिजित मुहूर्त: सकाळी ११ वाजून ५२ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे, विजय मुहूर्त: दुपारी २ वाजून ३१ मिनिटे ते दुपारी ३ वाजून २४ मिनिटे असेल.
या’ गोष्टी दान करा
अशा परिस्थितीत, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, तुम्ही गरीब आणि गरजू लोकांना पाण्याने भरलेले भांडे वाटू शकता. यासोबतच या दिवशी पखा, चप्पल, छत्री, धान्य किंवा फळे इत्यादी दान करणेदेखील खूप शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात.
बुद्ध पौर्णिमा उत्सव
या शुभ दिवशी, बुद्धांचे भक्त काही विशेष विधी करतात ज्यांची सुरुवात सकाळी लवकर स्नान करून आणि शुद्धतेचे प्रतीक असलेले पांढरे कपडे परिधान करून होते. बुद्धांच्या मूर्तीला स्नान घातले जाते आणि धूप, दिवे, फुले आणि फळे अर्पण केली जातात. शांतीपूर्ण प्रार्थना केल्या जातात, तर काही दिवसभर बुद्धांच्या शिकवणींचे पठण करतात.
वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हटले जाते?
वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला गौतम बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती असे मानले जाते. वैशाख शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. बिहार मधील गया येथे बोधी वृक्षाखाली बसले असताना त्यांना याच दिवशी म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली होती. गौतम बुद्धांनी आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्गाची सर्वांना शिकवण दिली. बौद्ध धर्माची त्यांनी स्थापना केली. म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

