Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या मंत्रांचा जप करण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व आणि फायदे जाणून घ्या

"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या मंत्रांचा जप करण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व आणि फायदे जाणून घ्या

  • दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रांचा अर्थ
  • या मंत्रांचे धार्मिक महत्त्व काय आहे
  • या मंत्रांचा जप केल्याने काय फायदे होतात

भारतीय अध्यात्मपरंपरेमध्ये मंत्रजपाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरण यांच्या माध्यमातून मनुष्य आत्मिक उन्नती साधतो, असे संतांनी सांगितले आहे. दत्तसंप्रदायात अनेक प्रभावी मंत्र प्रचलित आहेत; त्यापैकी "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा महामंत्र अत्यंत प्रसिद्ध आणि चमत्कारिक मानला जातो. हा मंत्र उच्चारताच भक्तांच्या मनात शांतता, श्रद्धा आणि दत्तभक्तीची भावना जागृत होते.

श्रीपाद श्रीवल्लभ कोण होते?

श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार मानले जातात. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पीठापूर येथे झाला होता. दत्तसंप्रदायात त्यांना अत्यंत पूजनीय स्थान आहे. त्यांनी आपल्या जीवनातून भक्ती, सेवा, करुणा आणि धर्म यांचा संदेश दिला. अनेक भक्तांच्या संकटांचे निवारण करून त्यांनी दत्तभक्तीचा प्रसार केला.

दिगंबरा हा मंत्र प.पू.वासुदेवानंद सरस्वती यांना ब्रह्मांनद येथे शके 1825 साली स्फुरलेला 18 अक्षरी मंत्र आहे. या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. या मंत्रामध्ये एकाक्षरी गणेशमंत्र, गणेशबीज समाविष्ट आहे. काही प्रमाणात अग्नीबीजाचाही वापर केला आहे. या महामंत्राचे स्पष्टीकरण एका आरतीमध्ये आणि प.पू.वासुदेवानंद सरस्वतींनी केले आहे. त्याचा अर्थ पू.श्रीदत्तमहाराज कवीश्वरांनी पुढीलप्रमाणे सांगितला. या मंत्रात ” अहं ब्रह्मास्मि” मी ब्रह्म आहे आणि ते तूच आहेस हे सांगितले आहे.

यातील पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे वस्त्र नसलेला म्हणजेच उपाधि नसलेला. हे लक्षात आले म्हणजे आपल्या आतील शुद्ध अहं अर्थात आत्मा सर्वसाक्षी, निर्विकार, अनंत अनादि असून ब्रह्मच आहे.

Guru Pushyamrit Yoga: गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? या काळात कोणती कामे करावीत, जाणून घ्या

"दिगंबरा" शब्दाचा अर्थ

"दिगंबर" या शब्दाचा अर्थ -

दिशाच ज्यांचे वस्त्र आहेत ते असा होतो. हा शब्द पूर्ण वैराग्य, निर्लेपता आणि विश्वरूपाचे प्रतीक मानला जातो. भगवान दत्तात्रेय हे सर्व बंधनांच्या पलीकडे असलेले, निराकार आणि विश्वव्यापी तत्त्व आहेत. त्यामुळे त्यांना "दिगंबर" असे संबोधले जाते.

मंत्राचा संपूर्ण अर्थ

"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"

या मंत्राचा भावार्थ असा आहे की "हे विश्वरूप, वैराग्यस्वरूप, सर्वांचे रक्षण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ, आम्ही तुम्हाला नमस्कार करतो."

या मंत्रात दत्तप्रभूंचे स्मरण, शरणागती आणि भक्तिभाव दडलेला आहे. दत्तसंप्रदायातील संत, साधक आणि भक्तांच्या परंपरेतून हा मंत्र प्रचलित झाला. अनेकांच्या मते, हा मंत्र स्वयंभू स्वरूपाचा असून श्रीदत्तभक्तांनी अनुभवातून स्वीकारलेला आहे. दत्तसंप्रदायातील भजन, नामस्मरण आणि दत्तजयंती उत्सवांमध्ये हा मंत्र विशेषतः गायला जातो.

मंत्रजपाचे आध्यात्मिक महत्त्व

दत्तसंप्रदायात नामस्मरणाला मोठे स्थान आहे. "दिगंबरा दिगंबरा…" या मंत्राचा जप केल्याने मन एकाग्र होते आणि अंतर्मनातील नकारात्मक विचार कमी होतात. भक्तांचा विश्वास आहे की, हा मंत्र संकटसमयी धैर्य देतो आणि मानसिक स्थैर्य निर्माण करतो.

Adhik Maas 2026: अधिक महिन्यात तयार होत आहे शुभ योग; 15 जूनपूर्वी या राशींच्या लोकांना होऊ शकतो मोठा लाभ

या मंत्रजपाचे फायदे

मानसिक शांतता प्राप्त होते

नियमित मंत्रजपामुळे मनातील तणाव, चिंता आणि अस्थिरता कमी होते.

सकारात्मक ऊर्जा वाढते

घरातील नकारात्मक वातावरण कमी होऊन प्रसन्नता निर्माण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

श्रद्धा आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो

दत्तभक्तीमुळे मनाला आध्यात्मिक आधार मिळतो. समाधान लाभते. नामस्मरणाने चित्त एकाग्रता वाढते.

एकाग्रता वाढते

विद्यार्थी, साधक आणि ध्यान करणाऱ्यांसाठी हा मंत्र उपयुक्त मानला जातो. कारण यामुळे चित्त एकाग्र होऊन आपले लक्ष ध्येयाकडे फोकस करते.

संकटांमध्ये धैर्य मिळते

अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार हा मंत्र कठीण काळात मानसिक बळ देतो. त्यामुळे संकटकाळात हा सोबती होतो. मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने मंत्राचा जप केल्यास संकटं ही दूर होतो.

दत्तकृपेची अनुभूती

भक्तिभावाने जप केल्यास दत्तप्रभूंची कृपा लाभते, अशी श्रद्धा आहे.

मंत्रजप कधी करावा?

पहाटेचा काळ

ब्रह्ममुहूर्त हा मंत्रजपासाठी सर्वात शुभ मानला जातो.

गुरुवारी

गुरुवार हा भगवान दत्तात्रेयांचा दिवस मानला जात असल्याने त्या दिवशी जप विशेष फलदायी मानतात. दत्तजयंती आणि गुरुपौर्णिमा या दिवशी सामूहिक नामस्मरणाला विशेष महत्त्व असते.

प्रवासात किंवा काम करतानाही हा मंत्र साधा आणि सहज असल्याने चालताना, बसताना किंवा ध्यानधारणेदरम्यानही म्हणता येतो.

जप कसा करावा?

स्वच्छ ठिकाणी शांतपणे बसावे.

दत्तप्रभूंचे स्मरण करून श्रद्धेने मंत्र म्हणावा.

१०८ वेळा जप करणे शुभ मानले जाते.

जप करताना मन भक्तिभावाने आणि सकारात्मक विचारांनी भरलेले असावे.

"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा केवळ मंत्र नसून दत्तभक्तांसाठी श्रद्धा, विश्वास आणि आत्मिक शक्तीचा स्रोत आहे. या मंत्राच्या सातत्यपूर्ण जपामुळे मनाला शांतता, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी भक्तांची भावना आहे. आधुनिक धावपळीच्या जीवनातही हा मंत्र मनाला स्थैर्य देणारा आणि अध्यात्माशी जोडणारा प्रभावी मार्ग मानला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra