- हनुमानाची भक्ती आणि नारदमुनींच्या अहंकाराची कथा
- हनुमानांनी नारदमुनींनाच वीणा वाजवायला सांगितली
- नारदमुनींचा अहंकरा कसा धा
हिंदू धर्मग्रंथांमध्ये भक्ती, नम्रता आणि समर्पण यांचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा आढळतात.
त्यापैकी हनुमानाची भक्ती आणि नारदमुनींचा अहंकार यांच्याशी संबंधित कथा अत्यंत प्रसिद्ध मानली जाते. त्यासोबतच रामभक्त हनुमानाच्या अनेक चमत्कारीत आणि रंजक कथा पुराणात आढळतात. त्यापैकी एक रंजक कथा म्हणजे नारदमुनींचा अहंकार आणि हनुमानाची भक्ती. काय आहे ही कथा जाणून घेऊया
हनुमान करत होते रामनाम जप
एकदा भगवान विष्णूंनी नारदांना विचारले, "तुम्हाला वाटते का की तुम्ही माझे सर्वात मोठे भक्त आहात?" नारदांनी आत्मविश्वासाने होकार दिला. तेव्हा विष्णूंनी त्यांना पृथ्वीवर जाऊन एका भक्ताला भेटण्यास सांगितले. नारद पृथ्वीवर आले आणि त्यांनी पाहिले की तो भक्त दुसरा कोणी नसून श्रीरामांचे परमभक्त हनुमान आहेत. हनुमान कोणताही दिखाऊ जप, तप किंवा यज्ञ करत नव्हते. ते आपल्या प्रत्येक कृतीत श्रीरामांचे स्मरण करत होते.
हनुमान हे भगवान रामाचे सर्वांत मोठे भक्त हे माहीत असूनही एकदा नारदमुनींना वाटले की, आपल्यापेक्षा मोठा श्रीराम भक्त कोणीच नाही त्यांचा हा अहंकार पाहून श्रीरामांनी नारदाना हनुमानाची भेट घ्यायला सांगितले. नारद हनुमानजींना भेटायला गेले तेव्हा हनुमान राम नाम जपत होते. नारदांनी विचारले तू दिवसभर काय करतोस हनुमानाने उत्तर दिलं मी दिवसभर रामाच नामस्मरण करतो.
हनुमानांनी नारदांनाच वीणा वाजवायला सांगितले
नारद म्हणाले, फक्त नामस्मरण करण्याऐवजी तू वीणा वाजवून गा तेव्हा हनुमानाने नारदांनाच वीणा वाजवून दाखवण्यास सांगितलं. नारदांनी वीणा वाजवण्यास सुरुवात केली पण त्या सुरांमध्ये आणि तानामध्ये एवढी ताकद होती आजूबाजूला एकच गोंधळ उडाला शेवटी दमून नारदांनी ती वीणा हनुमानाकडे दिली. हनुमानाने अगदी एकाग्रतेने राम असं म्हणत वीणा वाजवली. यातून निघालेल्या मृदू स्वराने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झालं आणि खुद्द भगवान शिवराम तिथे प्रकट झाले यामुळे नारदमुनींचा अहंकार गळून पडला आणि त्यांना समजल की ज्ञानापेक्षा किंवा बाह्य साधनांपेक्षा नामजपातील शुद्ध भक्ती आणि एकाग्रताचं शुद्ध असते.
Ketu Gochar 2026: मघा नक्षत्रात केतू करणार प्रवेश, या राशींच्या वाढू शकतात अडचणी
नारदमुनींचा अहंकार दूर झाला
हनुमानांच्या निष्काम आणि निःस्वार्थ भक्तीसमोर नारदमुनींचा अभिमान टिकू शकला नाही. त्यांना जाणवले की केवळ जप किंवा ज्ञान यामुळे कोणी महान भक्त होत नाही. भक्तीमध्ये नम्रता, समर्पण आणि अहंकाराचा पूर्ण त्याग आवश्यक असतो. नारदमुनींनी भगवान विष्णूंची क्षमा मागितली आणि हनुमानांच्या भक्तीला प्रणाम केला.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

