- Jio ने 22 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 1GB डेटा देणारा 209 रुपयांचा प्लॅन बंद केला आहे.
- या निर्णयामुळे यूजर्सना आता महागडे प्लॅन घ्यावे लागणार असून खर्च वाढणार आहे.
- पर्याय म्हणून ग्राहक 249 रुपयांच्या प्लॅनकडे वळू शकतात, ज्यात 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
Xiaomi चाहत्यांना धक्का! कंपनी 'या' फोल्डेबल फोनला करणार 'Good Bye'? कारण काय? जाणून घ्या
आता अचानक हा प्लॅन बंद करण्यात आल्याने ग्राहकांना रिचार्जसाठी जास्तीचे पैस खर्च करावे लागणार आहेत. जिओच्या या निर्णयामुळे भारतातील लाखो कमी उत्पन्न असलेल्या मोबाईल यूजर्ससाठी एक महत्त्वपूर्ण बदल घडला आहे. जे यूजर्स कंपनीच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सवर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी कंपनीचा हा निर्णय फार धक्कादायक आहे. आतापर्यंत जे यूजर्स कंपनीचा हा प्लॅन खरेदी करत होते, त्या यूजर्सना आता दुसऱ्या प्लॅनची निवड करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य - Pinterest)
यूजर्सवर कसा होणार परिणाम?
यूजर्सनी जास्त किंमतीचा प्लॅन खरेदी करावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या रणनितीमुळे कंपनीला प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) वाढविण्यात मदत होईल. बाजारातील तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, कंपनीला त्यांच्या ग्लोबल 5G नेटवर्क विस्तारासाठी फंड गोळा करण्याची गरज आहे. यासाठीच कंपनीने आता त्यांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केला आहे, ज्यामुळे यूजर्सना नाईलाजाने महागडे रिचार्ज प्लॅन्स खरेदी करावे लागतील. भारतीय टेलिकॉम क्षेत्रात गेल्या काही काळापासून रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणं आणि स्वस्त प्लॅन बंद करणं अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. भारती एयरटेल आणि वोडाफोन आइडियाने देखील अलीकडेच त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती.
ग्राहकांकडे या रिचार्ज प्लॅन्सचा पर्याय
कंपनीने त्यांचा 209 रुपयांचा प्लॅन बंद केल्यानंतर आता यूजर्स 249 रुपयांच्या प्लॅनचा विचार करू शकतात. या रिजार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना डेला 1GB डेटाचा लाभ देखील मिळतो. ग्राहक सध्या जिओ रिचार्ज प्लॅन्सची दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनसोबत तुलना करत आहेत.

