- कर्जमुक्तीच्या ई-केवायसीला अल्प प्रतिसाद!
- १.०५ लाख शेतकरी पात्र
- मात्र केवायसी ३९ हजार शेतकऱ्यांचीच
कर्जमुक्ती योजना व ई-केवायसीची सद्यस्थिती
कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या नावांची यादी गावोगावी प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी जाऊन आपले नाव असल्याची खात्री करण्यासाठी जिल्हा बँका, विविध कार्यकारी सोसायटी, बैंक, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी गर्दी केली होती. राज्य सरकारने गाजावाजा करत पात्र ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही योजना आणली. या योजनेसाठी जिल्हाभरातील १,२७६ गावांमधील जवळपास १ लाख ५ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले आहेत. परंतू पात्र शेतकऱ्यांपैकी २९ जुलैअखेर ३९ हजार २६६शेतकऱ्यांनीच ईकेवायसी पूर्ण केल्याने त्यांनाच प्रत्यक्ष फायदा होणार आहे. जिल्हाभरातील एकूण एक लाख ९० हजार ७०१ कर्ज खात्यांपैकी डीसीसी बँकेचे ५५ हजार ९८१ कर्जखाती आहेत. तर उर्वरित बँकांची एक लाख ३४ हजार ७२० कर्जखाती आहेत.
७६७ केंद्रांवर होणार केवायसी
जिल्हाभरातील ७६७ आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ही केवायसी करण्यासाठी केंद्र चालकांनी कोणतेही शुल्क आकारु नये असे आदेश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी जारी केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत केवायसी करुन घेता येणार आहे.
असे आहे जिल्ह्यातील कर्जखात्यांचे प्रमाण
जिल्ह्यात एकूण कर्जखाती
१,९०,७०१
पोर्टलवर अपलोड कर्जखाती
१,०५,१२८
आधार प्रमाणीकरण (केवायसी) खाती
३९,२६६
केवायसी बाकी कर्जखाती
६५.८६२
८८ सरकारने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, ही समाधानाची बाब आहे. लाभार्थी यादी शेतकऱ्यांनी जाहीर केली. या लाभार्थीना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. केवायसीसाठी शेतकरी संबंधीत केंद्रांवर जातात परंतु
केवायसीसाठी स्वतंत्र शिबिरे का नाहीत?
महत्त्वाचे म्हणजे महाराजस्व अभियानातून शेती, महसूलची सर्व प्रलंबित कामे यातून निपटली जातात, मग केवायसीसाठी स्वतंत्र शिबिर का घेतले जात नाही, असा सवाल कृषी जाणकारांकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील केंद्रावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासनाने ग्रामीण भागात केवायसी शिबिरे घेऊन शेतक-यऱ्यांना दिलासा द्यावा. – नाना पाटील, शेतकरी

