तोंडात अल्सर येण्याची कारणे? अल्सर बरे करण्यासाठी घरगुती उपाय?
वाढत्या उष्णतेचा शरीरावर कसा परिणाम होतो?
राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यनंतर अंगाची काहिली होते.
याशिवाय शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे पचनाचे आजाराचं नाहीतर वारंवार तोंड येण्याची समस्या सुद्धा उद्भवू लागते. तोंडात लहान-लहान पांढरे फोड येणे, जळजळ होणे, अन्नपदार्थ खाताना तोंड झोंबणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात वाढलेली उष्णता बाहेर पडण्यास सुरुवात झाल्यानंतर तोंड येण्यासोबतच चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, मुरूम येऊन त्वचेचे नुकसान होते. तोंडात अल्सर येण्यामागे अनेक कारण आहेत. शरीरात वाढलेली उष्णता, तिखट किंवा आंबट पदार्थांचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, झोप न होणे किंवा मानसिक तणाव वाढल्यामुळे तोंडात वारंवार अल्सर येतात.(फोटो सौजन्य - istock)
तोंडात आलेले फोड काही दिवसांनंतर लगेच बरे होऊन जातात. तोंडात असलेल्या अल्सरचा वेदना काहीकाळ टिकून राहतात, पण हे घरगुती उपाय केल्यास तोंड पूर्णपणे बरे होईल. तोंडात वारंवार अल्सर येत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित थंड पेयांचे सेवन करावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नारळ पाणी प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आराम मिळेल. नारळ पाण्यात असलेले गुणधर्म शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय वाटीभर दही खाल्ल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन तोंडात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते.
तोंड आलेल्या ठिकाणी तूप लावल्यास तीन ते चार दिवसांमध्ये तोंड पूर्णपणे बरे होईल. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे केवळ तोंडातच नाहीतर आतड्यांमध्ये सुद्धा अल्सर येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि सतत तोंड येत राहत. तोंडात येणाऱ्या अल्सरवर प्रभावी उपाय म्हणजे शरीर आतून थंड ठेवणे. स्वयंपाक घरात मध कायमच उपलब्ध असत. तोंड आलेल्या भागावर मध लावून काहीवेळ तसेच ठेवल्यास तोंडातील अल्सर बरे होण्यास मदत होईल.
मधामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्यामुळे तोंडात वाढलेला विषाणू नष्ट होण्यास मदत होते. तोंडात आलेल्या अल्सरमुळे खूप जास्त वेदना होत असतील तर चिमूटभर हळदीमध्ये मध मिक्स करून पेस्ट तयार कारवी. तयार केलेली पेस्ट तोंड आलेल्या भागावर दोन ते तीन वेळा लावून ठेवल्यास फोडांवर आलेली सूज कमी होण्यास मदत होईल. आयुर्वेदात तुळशीच्या पानांना खूप जास्त महत्व आहे. नियमित सकाळी तोंड स्वच्छ धुतल्यानंतर तुळशीची २ किंवा ३ पाने चावून खाल्ल्यास तोंडातील जंतू नष्ट होतील आणि तोंड बरे होण्यास मदत होईल. जखम लवकर भरण्यासाठी अनेक लोक मीठ लावतात. पण मीठ लावल्यामुळे खूप जास्त वेदना आणि मीठ तोंडाला झोंबण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात दोन किंवा तीन वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
टीप - हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

