Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

  • निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
  • ४ अधिकारी निलंबित
  • कुटुंबाला १० लाखांची मदत
मुंबई:मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर एक दुर्दैवी घटना घडली असून, यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मृताची ओळख अस्लम इस्हाक शेख अशी पटली आहे. या प्रकरणी बीएमसीने (बृहन्मुंबई महानगरपालिका) चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सांडपाणी व्यवस्थापन विभाग (Sewage Operations Department) मॅनहोलवर सुरक्षा जाळी (safety grate) बसवण्याचे काम करत असताना ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, कंत्राटदाराने आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी केली नव्हती, ज्यामुळे ही गंभीर निष्काळजीपणाची घटना घडली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काम सुरू असताना मॅनहोलभोवती कोणतेही बॅरिकेड्स किंवा धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले नव्हते. अस्लम शेख मोबाईलवर बोलत असताना तिथून जात होते. कामगारांनी त्यांना थांबवण्यासाठी आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा तोल गेला आणि ते थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडले. घटनेनंतर बीएमसी आणि मुंबई अग्निशमन दलाच्या पथकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले, परंतु अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही.

या घटनेची गंभीर दखल घेत, बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांनी त्वरित चौकशीचे आदेश दिले आणि प्राथमिक चौकशीत निष्काळजीपणा सिद्ध झाल्यानंतर 'एल' (L) वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये सहाय्यक आयुक्त धनाजी हरलेकर, सहाय्यक अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौगुले आणि सांडपाणी व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता उत्तम पाटील यांचा समावेश आहे.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जलाशयांची जलपातळी ७.३१ टक्क्यांवर, पवई तलाव ओव्हरफ्लो; शुक्रवारी BMC ची मोठी बैठक

याव्यतिरिक्त, संबंधित कंत्राटदाराला 'ब्लॅकलिस्ट' करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या (पश्चिम उपनगरे) अध्यक्षतेखाली एक उच्च-स्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांना सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

महापौर रितू तावडे यांनी मृताच्या कुटुंबासाठी १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मुंबईतील सर्व मॅनहोल्सचे १००% सुरक्षा ऑडिट (safety audit) पुढील आठ दिवसांत करण्याचे निर्देशही बीएमसीने दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात निष्काळजीपणा आणि सुरक्षा मानकांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी सध्या सुरू आहे.

महापौर रितू तावडे काय म्हणाल्या?

मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या, 'येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे… मूळात त्या मॅनहोलवर झाकण होते, परंतु ते काढून तिथे सुरक्षिततेसाठी जाळी (ग्रेट) बसवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. प्रशासनाने 'रेड अलर्ट' जारी केलेला असताना आणि पाणी साचलेले असताना, पादचाऱ्यांना ते उघडे मॅनहोल दिसणे शक्य नव्हते… मुसळधार पावसात मॅनहोलवर जाळ्या बसवण्यासाठी ते उघडे ठेवण्याचे काम करू नये. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जाळ्या बसवण्याचे सर्व काम पूर्ण करावे, अशा सूचना मी वारंवार दिल्या होत्या… मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मला अत्यंत दुःख झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांसाठी १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे… संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात आली आहे… याची मुख्य जबाबदारी वॉर्ड ऑफिसरची आहे… मी त्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश देण्याची मागणी त्याच वेळी केली होती… त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे… 'रेड अलर्ट' आणि मुसळधार पाऊस असताना केलेले हे काम प्रशासनाची चूक होती…'

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra