Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे यांची निवड, 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व

नगर परिषदा महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडे यांची निवड, 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व

  • नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी रुचिता घोरपडें निवड
  • रुचिता घोरपडे बदलापूरच्या नगराध्यक्ष
  • राज्यातील 393 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचं करणार नेतृत्व
महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची निवड करण्यात आली.
मुंबई पार पडलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या महासंघात राज्यातील 393 नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत. महत्त्वाचं म्हणजे महासंघाच्या कार्यकारणी समितीत अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांचीही निवड करण्यात आली.

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे विषय सरकार दरबारी मांडणं, प्रशासनावर अंकुश ठेवणं तसच नगराध्यक्षांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याच्या उद्देशानं महासंघाची स्थापना करण्यात आलीय. गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट असल्यामुळे महासंघाची कार्यकारणी निवडण्यात आली नव्हती. मात्र आता त्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यामुळे अध्यक्षपदासह कार्यकारणी समिती निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्याला अनुसरून एकमतानं रुचिता घोरपडे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला नगराध्यक्षांना महासंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

Exclusive : जखम पोटाला प्लॅस्टर पाठीला! रखडलेला पुनर्विकास, तुटके बांधकाम…, मुंबईतील जगन्नाथ चाळीचं घोडे अडले कुठे?

ज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्षांच्या समस्यांना एकत्रित व्यासपीठ मिळावे, तसेच शासनदरबारी त्यांचा आवाज प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने महासंघ कार्यरत आहे. रुचिता घोरपडे या यापूर्वीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रिय राहिलेल्या असून, प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत त्यांनी सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यांच्या निवडीमुळे महासंघाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महासंघाच्या अध्यक्ष म्हणून त्या राज्यातील विविध नगराध्यक्षांमधील समन्वय वाढवणे, विकासकामांतील अडथळे दूर करण्यासाठी शासनाशी सातत्याने पाठपुरावा करणे, तसेच नागरी भागातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी ठोस धोरणात्मक पावले उचलणे, यावर भर देणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, शहरी विकास प्रकल्पांना गती देणे, निधीवाटपातील अडचणी सोडवणे आणि नागरिकाभिमुख प्रशासन उभारणे या दिशेनेही त्या प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवे नेतृत्व आणि नव्या धोरणांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra