Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nasha Mukt Abhiyan: तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; पुढील १०० रविवार चालणार विशेष मोहीम

Nasha Mukt Abhiyan: तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; पुढील १०० रविवार चालणार विशेष मोहीम

Nasha Mukt Abhiyan 2026: देशाला व्यसनाच्या वाढत्या आव्हानापासून वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवारी ‘नशा मुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियाना’चा शुभारंभ केला.

या अभियानाचा उद्देश केवळ व्यसनाविरुद्ध जनजागृती पसरवणे हा नसून, तरुणांना निरोगी आणि जबाबदार जीवनाकडे प्रेरित करणे हा आहे. सरकारने या मोहिमेतून देशभरातील १ कोटींहून अधिक तरुणांना जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याची सुरुवात एकाच वेळी २८ हजारांहून अधिक ठिकाणी झाली, जिथे मुख्यमंत्री, राज्यपाल, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि आध्यात्मिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या.

पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले की, हा केवळ सरकारी कार्यक्रम नाही, तर समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या सहभागाने चालणारे एक जनआंदोलन आहे, जे पुढील १०० रविवारपर्यंत सातत्याने लोकांना नशामुक्त भारताचा संदेश देईल.

देशभरात एकाच वेळी सुरू झालेली मोठी जनमोहीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘नशा मुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियाना’चा शुभारंभ केला. या राष्ट्रीय अभियानाचा उद्देश तरुणांना ड्रग्ज आणि इतर व्यसनांच्या वाईट सवयींपासून दूर ठेवणे हा आहे. सरकारने या अभियानाशी १ कोटींहून अधिक तरुणांना जोडण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. देशभरातील २८ हजारांहून अधिक ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, जिथे लोकांनी नशामुक्त भारताचा संकल्प केला.

१२५ हून अधिक संघटना बनल्या अभियानाची ताकद

पंतप्रधान म्हणाले की, हे अभियान केवळ सरकारपुरते मर्यादित नाही, तर यामध्ये समाजातील विविध घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. देशातील १२५ हून अधिक आध्यात्मिक संस्था, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक संस्था आणि औद्योगिक संघटना या मिशनशी जोडल्या गेल्या आहेत. ब्रह्माकुमारीज्, इस्कॉन, चिन्मय मिशन आणि ऑरोविले यांसारख्या प्रमुख आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधीही यामध्ये सहभागी झाले होते.

काशीतून सुरू झालेला विचार बनला राष्ट्रीय मिशन

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, या अभियानाची सुरुवात गेल्या वर्षी काशीमध्ये एका पायलट प्रोजेक्टच्या रूपात झाली होती. काशीतून मिळालेल्या यशानंतर आता ते संपूर्ण देशात लागू केले जात आहे. त्यांनी सांगितले की, या उपक्रमात वैज्ञानिक विचारांसोबतच भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक मूल्यांचाही समावेश करण्यात आला आहे. भारताची परंपरा नेहमीच व्यसनासारख्या वाईट गोष्टींचा विरोध करत आली आहे आणि हीच या अभियानाची सर्वात मोठी ताकद आहे.

पंतप्रधानांनी सांगितले की, १२५ हून अधिक आध्यात्मिक संघटना, अनेक सामाजिक संस्था आणि बिगर-शासकीय संघटना मिळून या मिशनला पुढे नेत आहेत. ‘काशी डिक्लेरेशन’च्या माध्यमातून अभियानासाठी एक सविस्तर आराखडा देखील तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे देशभरात जनजागृती आणि जनसहभाग मजबूत होऊ शकेल.

MBBS Admission 2026: वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशनाची तारीख ठरली! चॉईस लॉक करताना ‘या’ चुका टाळा

१०० रविवार चालणार नशामुक्तीचा संदेश

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काशीमधून निघालेला हा विचार आता देशव्यापी जनआंदोलन बनला आहे. त्यांनी सांगितले की, आजपासून सुरू झालेले ‘नशामुक्त युवा अभियान’ पुढील १०० रविवारपर्यंत सातत्याने चालेल. या काळात देशभरात कला, संस्कृती, अध्यात्म, खेळ, सेवा आणि जनजागरुणाशी संबंधित अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाईल. लाखो तरुणांनी या अभियानाच्या शुभारंभाच्या वेळी नशामुक्तीची शपथही घेतली.

Akbar Birbal Friendship: अकबर-बीरबलची जोडी का ठरते आजही एक आदर्श? जाणून घ्या या मैत्रीची खास वैशिष्ट्ये

तसेच त्यांनी पालकांना मुलांशी मोकळेपणाने संवाद साधण्याचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले, जेणेकरून मुले न घामता त्यांच्या समस्या सामायिक करू शकतील आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापूर्वी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra