Dailyhunt
Nashik News:अतिक्रमण काढूनही शहरातील वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

Nashik News:अतिक्रमण काढूनही शहरातील वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

  • वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच वाढला
  • बऱ्याच इतर समस्यांना तोंड द्यावं लागतं
  • बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण मिळवणं गरजेचं
Nashik News:सटाणा शहराचा विकास होता गेला. आजूबाजूच्या इमारतींमध्ये वाढ झाली.
सोयीसुविधा वाढल्या, लोकसंख्या वाढली. शहर वाढत गेलं पण शहरांमध्ये असलेले रस्त्यांची लांबी हे तेवढीच आहे. त्यामुळे सध्या यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच वाढला आहे. नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य रस्ते, महामार्गालगतची दुकाने तसंच अंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. या कारवाईमुळे गटारी व रस्ते मोकळे होऊन काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आहे. मात्र नागरिकांकडून होत असलेल्या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे पुन्हा एकदा शहरात वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र दिसत आहे.

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय

शहराचा झपाट्याने विस्तार

गेल्या काही वर्षांत सटाणा शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे. नव्या वसाहती, व्यापारी संकुले, दवाखाने, बँका आणि शैक्षणिक संस्था वाढल्या आहेत. मात्र रस्त्यांची रुंदी आणि संख्या मात्र वाढलेली नाही. परिणामी मुख्य रस्ते, महामार्ग तसेच अंतर्गत गल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची मोठी गर्दी होताना दिसत आहे. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहने अडकून राहतात. वाहतूक कोंडीमुळे बऱ्याच इतर समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. नागरिकांना बराच वेळ थांबूनच आपली वाहने पुढे न्यावी लागत आहेत. त्यामुळे या भागात स्थानिकांमध्ये चांगलीच निराशा दिसत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही जशाच तसा आहे.

परिणामी ध्वनीप्रदूषणातही वाढ

काही नागरिक खरेदीसाठी, दवाखान्यात जाण्यासाठी किंवा बँकेच्या कामासाठी येताना दुचाकी व चारचाकी वाहने आणतात. ही वाहनं थेट रस्त्यावरच उभी करून दुकानात निघून जातात. त्यामुळे अरुंद गल्ल्यांमध्ये पूर्णपणे वाहतूक ठप्प होते. या परिस्थितीत वाहनचालकांना कर्कश हॉर्न वाजवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागतो. परिणामी ध्वनीप्रदूषणातही वाढ होत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतूक जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी

नगर परिषदेने अतिक्रमण हटवून रस्ते आणि गटारे मोकळी केली असली तरी वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आता नागरिकांवरच आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेता नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था, ‘नो पार्किंग’ क्षेत्रांची स्पष्ट चिन्हे आणि वाहतूक जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर रस्ते मोकळे झाले असले तरी बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण मिळविल्याशिवाय सटाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही.

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra