Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर 'इंडिया'चा आक्रमक पवित्रा

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर 'इंडिया'चा आक्रमक पवित्रा

  • आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ई-२० पेट्रोलच्या सक्तीमुळे होणारे नुकसान आणि ग्राहकांच्या हक्कांवर चर्चा करण्यासाठी नोटीस
  • विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिर गैरव्यवहारावर अमित शाह यांनी सभागृहात येऊन भूमिका स्पष्ट करावी, यावर विरोधी पक्ष ठाम.
  • विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब
INDIA Alliance Protest Against Amit Shah: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार आणि विरोधी पक्षांमधील सुरू असलेला संघर्ष बुधवारीही कायम आहे. अयोध्येतील राम मंदिरातील प्रसादाच्या कथित चोरीवरून आणि दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाने सरकारला कोंडीत पकडण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळीदेखील संसदेसमोर विरोधी इंडिया आघाडीने केंद्रीय मंत्री अमित शांहाच्या विरोधात घोषणाबाजी केली. अमित शहा गेल्या काही दिवसांपासून संसदेत का येत नाहीयेत, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जप्रकरणी उत्तर देण्यासाठी अमित शाहांना संसदेत यावं लागेल, असा इशाराही विरोधी पक्षांकडून देण्यात आला.

विरोधी खासदारांचा गांधी पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत मोर्चा

यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी आणि इतर विरोधी खासदारांसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात सीजेपी आंदोलकांवरील पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिरातील प्रसादाची चोरी आणि इतर मुद्द्यांवरून निषेध करण्यासाठी २० जुलै रोजी प्रेरणा स्थळ येथील गांधी पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत मोर्चा काढण्यात आला.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; आता त्यांच्याविरोधात खटलाच चालणार

दरम्यान, काँग्रेसने सोशल मीडिया अकाऊंटवरूनही अमित शहांसह केंद्रातील भाजप सरकारवर प्रश्नांचा मारा केला आहे. “तुम्ही मुलांवर पेलेट गन वापरण्याचे आदेश का दिले?, मुलांवर एके-४७ ने गोळ्या का झाडण्यात आल्या? पावसाळी अधिवेशन १३ दिवसांपासून सुरू आहे-अमित शाह सभागृहात का येत नाहीत? एवढी भीती का?” असे प्रश्न विचारून काँग्रेसने अमित शहांवर हल्लाबोल केला आहे.

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना अमित शांहांवर गंभीर आरोपही केले होते. अमित शाहांच्या आदेशाने विद्यार्थ्यांना निर्दयी लाठीचार्ज करण्यात आला. त्यांच्याच आदेशाने विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला,असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांनी, २० जुलै रोजी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि बळाच्या वापरासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीत काही गंभीर आरोप केले होते. “शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा दलांनी अंदाधुंद बळाचा वापर केला आणि यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली होती.

तसेच, विद्यार्थी एका निष्पक्ष आणि जबाबदार शिक्षण प्रणालीची मागणी करत होते, परंतु त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रे आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या कारवाईत शेकडो विद्यार्थी जखमी झाले आणि महिला आंदोलकांनाही कथितरित्या वाईट वागणूक देण्यात आली. असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात पेलेट गनच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित होणारे व्हिडिओ गंभीर दुखापती दर्शवतात. त्यांनी १९ वर्षीय विद्यार्थी साहिल लोछाबचा उल्लेख केला असून, तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका जखमी पत्रकाराचाही उल्लेख केला होता.

राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शाह यांना दोन थेट प्रश्न विचारले. पहिला, त्यांनी विद्यार्थ्यांविरुद्ध पेलेट गनसह प्राणघातक बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती का? नसेल तर, कोणी दिली होती? दुसरा, आंदोलनादरम्यान साध्या वेशात विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करणारे लोक पोलीस होते की स्वयंसेवक, आणि त्यांना कोणाच्या आदेशाने तैनात करण्यात आले होते? अे अनेक सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: NavaRashtra