Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोहत्या न करणारा खरा मुस्लिम.रामपूर पोलिस अधीक्षकांच्या वक्तव्याची चर्चा

गोहत्या न करणारा खरा मुस्लिम.रामपूर पोलिस अधीक्षकांच्या वक्तव्याची चर्चा

NEWS डंका 2 weeks ago

श्रावण महिन्यात गंज, स्वार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोहत्येच्या घटना

रामपूरचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार सिंह सिसोदिया यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटले होते की, 'खरा मुस्लिम गोहत्या किंवा दुसऱ्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृत्यात सहभागी होणार नाही.'

मात्र, नंतर त्यांनी स्पष्टीकरण देत आपले वक्तव्य सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द वाढवण्याच्या उद्देशाने केले होते, परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगितले.

गुरुवारी पोलीस लाईन्स येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सिसोदिया यांनी गोहत्या रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, श्रावण महिन्यात गंज आणि स्वार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोहत्येच्या घटना समोर आल्या आहेत.

ते म्हणाले, 'इस्लामनुसार, एखाद्या प्राण्याची हत्या केल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावत असतील, तर त्या प्राण्याचे मांस खाणे हराम म्हणजेच निषिद्ध आहे. खरा मुस्लिम असे कृत्य कधीही करू शकत नाही. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेले लोक एकतर मुस्लिम नाहीत, अशा लोकांवर कारवाई करणे हे माझे काम आहे.'

पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, रामपूरमधील मुतवल्ली आणि धार्मिक विद्वानांच्या बैठका घेऊन, गोहत्येच्या घटना घडू नयेत यासाठी त्यांना आवाहन केले जाईल.

दहा वर्षांतील गोहत्या प्रकरणांची पडताळणी

सिसोदिया यांनी गेल्या दहा वर्षांत गोहत्या प्रकरणांमध्ये कथितरीत्या सहभागी असलेल्या व्यक्तींची पडताळणी मोहीम राबवण्याची घोषणाही केली. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना संबंधित व्यक्तींची माहिती असलेली नोंदवही तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नोंदीमध्ये संबंधित व्यक्तींवरील प्रकरणे, त्यांना मिळालेल्या जामिनाच्या अटी तसेच त्यांच्या जामीनदारांची माहिती समाविष्ट केली जाणार आहे.

होर्मुज सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला

ई-२० पेट्रोलमध्ये क्लोराइड, पाण्याची भेसळ नाही!

बंगळुरूतील फाईव्ह स्टार हॉटेल्समधून सडलेले दूध, मांस जप्त

इसबगोल ठरतोय 'सुपरफूड'; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत अनेक फायदे

वक्तव्यावर वाद झाल्यानंतर स्पष्टीकरण

आपल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर सिसोदिया यांनी स्पष्टीकरण दिले. पत्रकारांनी गोहत्येबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात आपण हे वक्तव्य केले होते, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी दारुल उलूम देवबंदच्या कथित भूमिकेचा उल्लेख करत सांगितले की, दुसऱ्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावू शकतील अशा प्राण्यांची हत्या करणे योग्य नसल्याचे या इस्लामी धार्मिक संस्थेने अनेक वेळा म्हटले आहे आणि अशा कृत्याला हराम म्हटले आहे.

सिसोदिया म्हणाले, 'या संदर्भात मी केवळ सामाजिक सलोखा आणि सौहार्द राखण्याचे आवाहन केले होते. श्रावण महिन्यात अशा कोणत्याही घटना घडू नयेत, ज्यामुळे दुसऱ्या समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील. अशा कृत्यांना टाळले पाहिजे.'

आपला उद्देश कोणत्याही धर्माच्या किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'माझा उद्देश केवळ परस्पर बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द कायम ठेवणे हा होता. माझ्या वक्तव्याचा अन्य कोणताही अर्थ काढला गेला असेल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर तो माझा हेतू कधीच नव्हता,' असे सिसोदिया यांनी म्हटले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka