कंगना रणौत यांचा शर्मिला टागोर यांना टोला
'वंदे मातरम्'च्या सादरीकरणावरून सुरू असलेल्या वादात अभिनेत्री कंगना रणौत यांनी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
'वंदे मातरम्'मधील धार्मिक संदर्भांकडे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नये, असे सांगत कंगना यांनी शर्मिला टागोर यांना 'हिंदू-मुस्लिम मानसिकतेतून बाहेर या', असे आवाहन केले.
शर्मिला टागोर यांनी अलीकडेच 'वंदे मातरम्'ची केवळ पहिली दोन कडवी कायम ठेवण्याचे मत व्यक्त केले होते. पुढील कडव्यांमध्ये हिंदू देवी-देवतांचे संदर्भ असल्याने एकेश्वरवाद मानणाऱ्या लोकांना ते स्वीकारणे कठीण जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले होते.
कंगना रणौत यांनी शर्मिला टागोर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ आपल्या समाजमाध्यमावरील कथेत शेअर करत प्रतिक्रिया दिली. शर्मिला टागोर यांनी आपली भूमिका मांडल्याबद्दल त्यांचा आदर असल्याचे सांगतानाच, एका कलाकाराने कविता किंवा कलाकृतीचा अर्थ इतका मर्यादित पद्धतीने लावणे आपल्याला आश्चर्यकारक वाटते, असे कंगना यांनी म्हटले.
कविता आणि गीतांमध्ये रूपकांचा वापर केला जातो. कवी किंवा कलाकार अपेक्षित परिणाम साधण्यासाठी विविध कल्पना आणि प्रतिमांचा वापर करतो. त्यामुळे 'वंदे मातरम्'मधील शक्तीच्या उल्लेखाकडे केवळ धार्मिक विधी म्हणून पाहणे योग्य नसल्याचे कंगना यांनी सांगितले.
'राहुल गांधीं'मुळे कर्नाटकच्या तरुणीने लग्नाचा निर्णय केला रद्द
दहशतवादाविरोधात पोलंड भारतासोबत!
मस्क यांनी पुन्हा ठोठावले भारताचे दार; स्टारलिंकच्या 'जेन-२' साठी नव्याने अर्ज
'वंदे मातरम्' म्हणजे स्वातंत्र्यलढ्याची भावना
कंगना यांनी 'वंदे मातरम्' हे स्वातंत्र्यलढ्याच्या भावनेचे प्रतीक असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी देशातील शक्ती जागृत करण्याचे आवाहन या गीतातून केले. त्यामुळे या महान कलाकृतीला केवळ धार्मिक प्रथेपुरते मर्यादित करणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.
कंगना यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचाही संदर्भ दिला. युवकांमध्ये लोखंडासारखी इच्छाशक्ती, पोलादासारखी हाडे आणि विजेसारखी ऊर्जा असावी, असे विवेकानंदांनी म्हटल्याचा उल्लेख त्यांनी केला. विवेकानंद हवामानाचा अंदाज सांगत नव्हते, तर युवकांमधील शक्ती जागृत करण्याचे आवाहन करत होते, असे कंगना यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कवितेतील 'शक्ती'चा उल्लेख केवळ देवी किंवा धार्मिक श्रद्धेशी जोडण्याऐवजी तो सामर्थ्य, ऊर्जा आणि जागृतीचे प्रतीक म्हणूनही समजून घेतला पाहिजे, असा कंगना यांचा युक्तिवाद आहे.
कंगना यांनी पुढे म्हटले की, 'हिंदू-मुस्लिम मानसिकतेतून बाहेर या.' एकेश्वरवाद मानणाऱ्या व्यक्तींनाही डॉक्टरांच्या भाषेत शरीरातील शक्ती किंवा सामर्थ्याला 'शक्ती' म्हटले जाते, असे त्यांनी उदाहरण दिले. भारतातील विविध समुदायांनी एकमेकांना समजून घेत एकत्र येण्याची गरज असल्याचेही कंगना यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले.

