Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'मस्का लावणाऱ्या क्विझ मास्टरने तृणमूलला संकटाच्या खाईत लोटले!'

'मस्का लावणाऱ्या क्विझ मास्टरने तृणमूलला संकटाच्या खाईत लोटले!'

NEWS डंका 2 weeks ago

माजी खासदार जवाहर सरकार यांनी केला घणाघाती आरोप

तृणमूल काँग्रेसच्या अडचणी काळानुसार वाढताना दिसत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये खराब कामगिरी झाल्यानंतर आता पक्षामध्ये अंतर्गत मतभेदही समोर येत आहेत.

पक्षाचे अनेक माजी आमदार पक्षाच्या रचनेवर आणि समन्वयावर टीका करत आहेत.

या टीकाकारांच्या यादीत आता माजी नोकरशहा-राजकारणी आणि तृणमूल काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांचाही समावेश झाला आहे. त्यांनी पक्षातील काही नेत्यांना आपले लक्ष्य केले आहे. त्यांनी नाव न घेता राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांचा उल्लेख मस्का लावणारा क्विझ मास्टर' असा केला आणि ते ममता बॅनर्जी यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणारे असल्याचा टोला लगावला.

'आमचे काही कुटील पक्षनेते, ज्यांनी आयुष्यात काहीच पाहिले नाही, ते उद्या इतिहासातून गायब होतील. त्यांच्याकडे काहीही नाही. एक जण क्विझ मास्टर आहे, ज्याने आयुष्यात काहीच केले नाही, योग्य क्विझसुद्धा नाही, पण फक्त ममता बॅनर्जी यांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देऊन तो अवाजवी सत्ता उपभोगत आहे,' असे सरकार यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

परदेशी नोकरीचे आमिष दाखवून 'सायबर गुलामगिरी'

११८ आमदार दाखवा आणि सरकार स्थापन करा!

सरकार यांनी असेही म्हटले की, या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांची गंभीर दिशाभूल केली आणि पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या पराभवाला तेच जबाबदार आहेत.

ही पहिली वेळ नाही की सरकार यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. आरजी कर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. त्या वेळी त्यांनी वाढता भ्रष्टाचार, दादागिरी, गैरव्यवस्थापन आणि पक्षपातीपणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांचे राजीनामा पत्र त्या काळात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

'स्थिती खूप वाईट झाली होती. माझ्या राजीनामा पत्रात, जे त्या वेळी व्हायरल झाले होते, मी भ्रष्टाचार, दादागिरी, गैरव्यवस्थापन आणि पक्षपातीपणा यांसारखे मुद्दे मांडले होते. ममता बॅनर्जी यांनी माझ्याशी बोलून यातील बहुतेक गोष्टी प्रचार असल्याचे सांगितले,' असे सरकार यांनी त्यांच्या अलीकडील मुलाखतीत म्हटले.

मुलाखतीनंतर काही तासांनी सरकार यांनी एक्सवर पोस्ट करून ममता बॅनर्जी यांच्यावर त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

'जर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाची भ्रष्ट आणि खंडणीखोर अशी तयार झालेली प्रतिमा याबाबत माझ्या अनेक इशाऱ्यांकडे लक्ष दिले असते, सप्टेंबर २०२४ मधील माझे टीएमसी खासदारपदाचे राजीनामा पत्र जितके स्पष्ट असू शकते तितके स्पष्ट होते, तर कदाचित त्यांना असा अपमान सहन करावा लागला नसता! त्याऐवजी मी पक्ष सोडला आणि एका मस्का लावणाऱ्या क्विझ मास्टरने टीएमसीला या संकटापर्यंत आणले. कर्म!!' असे त्यांनी लिहिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka