Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नेपाळमध्ये हिंसाचाराने पुन्हा पेटले वातावरण

नेपाळमध्ये हिंसाचाराने पुन्हा पेटले वातावरण

अनेक शहरांत संचारबंदी, सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त

नेपाळमध्ये दोन धार्मिक समुदायांतील वाद हिंसक वळणावर गेल्यानंतर देशातील अनेक भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः भारत-नेपाळ सीमेलगतच्या सुनसरी जिल्ह्यात परिस्थिती गंभीर बनल्याने प्रशासनाने अनेक संवेदनशील भागांत संचारबंदी लागू केली असून मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सशस्त्र सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच कोणत्याही प्रकारच्या सभा, मोर्चे किंवा जमावबंदीवर बंदी घालण्यात आली आहे.

ही हिंसा दोन धार्मिक समुदायांच्या मिरवणुकांदरम्यान झालेल्या वादातून भडकली. वाद वाढताच दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड सुरू झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना अश्रुधूर, हवेत गोळीबार आणि अखेरीस जमावाला पांगवण्यासाठी थेट गोळीबार करावा लागला. या घटनेत एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले आहेत. अनेक वाहनांचे, घरांचे आणि व्यावसायिक आस्थापनांचेही नुकसान झाले आहे.

सरकार उलथवण्याचा दम देणाऱ्यांना अखेर उत्तर…

पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी उसळी

हिंसाचाराचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने सुनसरीतील विविध भागांत अनिश्चित काळासाठी निर्बंध लागू केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अफवा पसरवू नयेत आणि सामाजिक सलोखा कायम राखावा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka