Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पश्चिम बंगालच्या नव्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नीलम मीणा

पश्चिम बंगालच्या नव्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नीलम मीणा

NEWS डंका 0 months ago

नोज कुमार अग्रवाल यांना पदोन्नती देऊन मुख्य सचिवपदी नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) १९९८ बॅचच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी नीलम मीणा यांची पश्चिम बंगालच्या नव्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.

विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांना पदोन्नती देऊन पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव बनवण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

२०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील या मोठ्या प्रशासकीय फेरबदलामुळे नवे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष तृणमूल कॉंग्रेस आणि काँग्रेसने निवडणूक आयोग आणि नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमध्ये संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर नीलम मीणा यांची तात्काळ प्रभावाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाच्या निर्देशांनुसार, त्या या पदावर असताना निवडणूक विभागाच्या प्रधान सचिव पदाव्यतिरिक्त इतर कोणताही अतिरिक्त कार्यभार सांभाळणार नाहीत.

नीलम मीणा या पश्चिम बंगाल कॅडरच्या अनुभवी प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी हुगळी जिल्हाधिकारी, सिलिगुडी जलपाईगुरी डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्राहक व्यवहार विभागाच्या प्रधान सचिव अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्या लीना चक्रवर्ती यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नियुक्त होणाऱ्या दुसऱ्या महिला आयएसएस अधिकारी ठरल्या आहेत.

राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत पाच गर्भवती महिलांचा मृत्यू

१५० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात अनिल अंबानी समूहावर फसवणुकीचा नवा गुन्हा

अणुकरारापूर्वी इराण समृद्ध युरेनियम चीनकडे सोपवणार?

सिद्धरामय्या- डीके शिवकुमार दिल्लीत; कर्नाटक मंत्रिमंडळात होणार फेरबदल?

या नियुक्तीनंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी माजी मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल आणि निवडणूक आयोगावर टीका केली. त्यांनी आरोप केला की विधानसभा निवडणुकांदरम्यान संपूर्ण निवडणूक यंत्रणा भाजपच्या बाजूने काम करत होती. कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'आम्ही वारंवार सांगितले आहे की निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले नाही. माजी मुख्य निवडणूक अधिकारी आणि भाजप यांच्यात संगनमत होते. मतमोजणी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले. आमच्या उमेदवारांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करण्यात आले. केंद्रीय सुरक्षा दलांनीही गैरप्रकारांना मदत केली.' तृणमूल नेत्यांचा आरोप आहे की निवडणूक संपल्यानंतर मनोज कुमार अग्रवाल यांना मुख्य सचिवपद देणे म्हणजे त्यांच्या कामाचे बक्षीस देण्यासारखे आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka