Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राजस्थानमधील कुंभलगडच्या तटबंदीला दुसऱ्या सर्वात लांब तटबंदीचा बहुमान

राजस्थानमधील कुंभलगडच्या तटबंदीला दुसऱ्या सर्वात लांब तटबंदीचा बहुमान

'ग्रेट वॉल ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तटबंदीला युनेस्को सर्वेक्षणात मान्यता

राजस्थानातील कुंभलगड किल्ला (Kumbhalgarh Fort) या ऐतिहासिक किल्ल्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.

युनेस्कोच्या एका सर्वेक्षणात कुंभलगड किल्ल्याच्या ३६ किलोमीटर लांबीच्या सलग आणि सुरक्षित तटबंदीला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब अखंड भिंत म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर ग्रेट वॉल ऑफ चायना आहे.

अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला राजपूत लष्करी स्थापत्यकला, रणनीतीपूर्ण बांधकाम आणि सांस्कृतिक वारशाचे उत्कृष्ट उदाहरण मानला जातो. उदयपुरपासून सुमारे ८४ किलोमीटर अंतरावर असलेला कुंभलगड किल्ला मजबूत संरक्षणव्यवस्था आणि दुर्गम भौगोलिक स्थितीमुळे इतिहासात जवळपास अजिंक्य मानला जात होता. या किल्ल्याचे बांधकाम मेवाडचे पराक्रमी शासक राणा कुंभ यांनी इ.स. १४४३ ते १४५८ दरम्यान करवून घेतले. किल्ल्याचे मुख्य वास्तुकार मदन होते, ज्यांची मध्ययुगीन भारतातील प्रमुख वास्तुविशारदांमध्ये गणना केली जाते.

कुंभलगड किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची विशाल तटबंदी. तिला अनेकदा 'ग्रेट वॉल ऑफ इंडिया' असे संबोधले जाते. ही तटबंदी सुमारे ३६ किलोमीटर लांब असून तिची रुंदी १५ ते २५ फूट आहे. स्थानिक मान्यतेनुसार, या भिंतीवर एकाच वेळी आठ घोडे धावू शकतात इतकी ती रुंद आहे. तटबंदीमध्ये सुरक्षेसाठी मजबूत बुरूज, पहारेकऱ्यांसाठी चौक्या आणि बाण सोडण्यासाठी विशेष झरोके तयार करण्यात आले आहेत. किल्ल्यात प्रवेशासाठी सात भव्य दरवाजे असून ते संरक्षणव्यवस्था अधिक मजबूत करतात. पर्वत, जंगले आणि दऱ्यांमधून जाणारी ही तटबंदी भारतातील सर्वात अद्भुत अभियांत्रिकी कामगिरींपैकी एक मानली जाते.

कुंभलगड किल्ला यापूर्वीच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. २०१३ मध्ये राजस्थानमधील Hill Forts of Rajasthan समूहाचा भाग म्हणून त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. या समूहात Chittorgarh Fort, Ranthambore Fort, Gagron Fort, Amer Fort, Jaisalmer Fort आणि कुंभलगड किल्ल्याचा समावेश आहे. हा किल्ला केवळ लष्करी दृष्टिकोनातूनच महत्त्वाचा नव्हता, तर तो एक स्वयंपूर्ण आणि सुरक्षित नगर म्हणूनही कार्यरत होता. किल्ला परिसरात ३६० हून अधिक प्राचीन मंदिरे असून त्यामध्ये सुमारे ३०० जैन मंदिरे आणि अनेक हिंदू मंदिरे आहेत.

'पाकिस्तानबाबत भारताची चिंता दहशतवाद, मध्यस्थी नव्हे' - रुबिओ

सायनच्या प्रतीक्षा नगर डेपोत बेस्ट बसला आग; जीवितहानी नाही

नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना समन्स

भ्रष्टाचारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन; तृणमूल खासदाराकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

किल्ल्यातील सर्वात उंच ठिकाणी असलेला बादल महाल पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. येथून अरावली पर्वतरांगांचे नयनरम्य दृश्य दिसते. कुंभलगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आणखी एका कारणामुळे प्राप्त झाले आहे. हा महान राजपूत योद्धा महाराणा प्रताप यांची जन्मभूमी मानला जातो. मुघल साम्राज्याविरुद्धच्या संघर्ष आणि पराक्रमामुळे महाराणा प्रताप यांना भारतीय इतिहासात विशेष स्थान आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka