Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'सपा'ने आय पॅकला सांगितले बॅग पॅक करायला!

'सपा'ने आय पॅकला सांगितले बॅग पॅक करायला!

NEWS डंका 2 weeks ago

समाजवादी पक्षाने घेतला निर्णय

२०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने राजकीय सल्लागार संस्था इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी (आय-पॅक) पासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या संस्थेशी संबंधित पक्षांना अलीकडेच झालेल्या निवडणुकीतील पराभवाचा सामना करावा लागल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने आय-पॅकसोबतच्या औपचारिक युतीची अधिकृत घोषणा कधीही केली नसली तरी, माहितीनुसार, संभाव्य प्रचार-व्यवस्थापन व्यवस्थेबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. आता ती चर्चा थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे. 'इंडिया टुडे' या संबंधीचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन यांच्या अलीकडील पराभवानंतर या निर्णयाला गती मिळाली, जिथे आय-पॅक निवडणूक रणनीती आणि प्रचार व्यवस्थापनात सहभागी असल्याचे मानले जात होते.

सपा नेतृत्वाला आता प्रचाराची कामे बाह्य सल्लागार संस्थेकडे सोपवण्याऐवजी स्वतःच्या संघटनात्मक जाळ्यावर आणि अंतर्गत राजकीय यंत्रणेवर अवलंबून राहायचे आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आय-पॅक (I-PAC) संदर्भात निर्माण झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हा पुनर्विचार होत आहे, जेव्हा अंमलबारी संचालनालयाने (ईडी ) एका कोळसा तस्करी प्रकरणाशी संबंधित मनी-लाँडरिंग चौकशीचा भाग म्हणून सल्लागार कंपनीच्या कोलकाता येथील कार्यालयात आणि सह-संस्थापक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. या धाडींमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता, ज्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी शोधमोहिमांदरम्यान आय-पॅक कार्यालयाला स्वतः भेट दिली आणि केंद्रीय यंत्रणा पक्षाचा डेटा व निवडणूक रणनीती सामग्रीला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला.

ईडीच्या कारवाईच्या वेळेमुळे पक्ष नेतृत्वातील काही गट आधीच अस्वस्थ झाले होते. ज्या दिवशी ईडीचे अधिकारी आय-पॅकच्या कोलकाता कार्यालयात शोधमोहीम राबवत होते, त्याच दिवशी त्या सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्यांना २०२७ च्या निवडणुकांसाठी संभाव्य सहकार्यासंदर्भात सादरीकरण देत होते. त्या प्रकरणामुळे, तसेच त्यानंतर बंगाल आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवांमुळे, आय-पॅकशी जास्त जवळीक साधल्यास त्याचे राजकीय दुष्परिणाम होऊ शकतात, हा समाजवादी पक्षातील दृष्टिकोन अधिक दृढ झाला, असे म्हटले जाते.

तिकिटासाठी तृणमूलने मागितले पाच कोटी!

जालंधर, अमृतसरमधील स्फोटांमागे भाजप; मुख्यमंत्री मान यांचा आरोप

दिल्ली ब्लास्ट प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ४०.९० लाख लुटले

संदेशखालीमध्ये तृणमूल कार्यकर्त्यांचा केंद्रीय दलांसह पोलिसांवर गोळीबार

पक्ष या प्रकरणी कोणतेही औपचारिक सार्वजनिक निवेदन करण्याची शक्यता कमी आहे. समाजवादी पक्ष किंवा आय-पॅक या दोघांनीही फुटीच्या वृत्तांवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. २०२७ ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक समाजवादी पक्ष आणि भाजप यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून, अखिलेश यादव यांनी बेरोजगारी, जात जनगणना, कायदा व सुव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka