Dailyhunt
श्रीलंका हरला; तरी पाकडे चालले घरला!

श्रीलंका हरला; तरी पाकडे चालले घरला!

NEWS डंका 2 months ago

टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानच्या संघाचा प्रवास अखेर थांबला आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना संपण्यापूर्वीच पाकिस्तान स्पर्धेबाहेर झाला. मोठा संघर्ष करूनही पाकिस्तानला हवी तशी कामगिरी करता आली नाही आणि नेट रन रेटच्या गणितात त्यांची आशा कोसळली.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २१३ धावांचा भक्कम टार्गेट उभारला. फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला स्पर्धेत टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

मात्र केवळ विजय पुरेसा नव्हता!
सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला १४७ धावांपेक्षा कमी धावांत रोखणं आवश्यक होतं. म्हणजेच किमान ६५ धावांनी विजय हवा होता.

श्रीलंकेने सुरुवातीला विकेट्स गमावल्या, पण अखेर १४७ धावांचा टप्पा ओलांडला… आणि इथेच पाकिस्तानचं स्वप्न भंगलं.

ग्रुप २ मधून इंग्लंडने सुपर-८ मधील तिन्ही सामने जिंकत ६ गुणांसह सेमीफायनल गाठलं. श्रीलंका आधीच स्पर्धेबाहेर होती. त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील स्पर्धा या एका सामन्यावर अवलंबून होती.

न्यूझीलंडचा प्रवास असा होता:

पहिला सामना पावसामुळे रद्द - १ गुण

दुसरा सामना श्रीलंकेवर विजय - २ गुण

तिसऱ्या सामन्यात पराभव

एकूण ३ गुण आणि +१.३९० रन रेट.

पाकिस्तानचा सुपर-८ प्रवास:

न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द - १ गुण

इंग्लंडविरुद्ध पराभव

श्रीलंकेविरुद्ध मोठ्या फरकाने विजयाची गरज

पाकिस्तानकडे २ सामन्यांनंतर फक्त १ गुण आणि -०.४६१ रन रेट होता. त्यामुळे मोठ्या फरकाने जिंकणं अत्यावश्यक होतं.

पाकिस्तानच्या फलंदाजांनी घाम गाळून मोठा स्कोर उभारला, पण गोलंदाजांना श्रीलंकेला आवश्यक धावांखाली रोखता आलं नाही. शेवटी नेट रन रेटचं गणित आडवं आलं आणि पाकिस्तानचं टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील आव्हान संपुष्टात आलं.

न्यूझीलंडने मात्र सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka